शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी विसर्ग!

By admin | Updated: May 2, 2017 01:43 IST

महान- ६४ खेडी गावांना व मूर्तिजापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, करिता मागणीनुसार दर दहा दिवसांनंतर महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

महान : खांबोरा उन्नई बंधाऱ्याची पाणी पातळी खोलवर गेल्याने ६४ खेडी गावांना व मूर्तिजापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, करिता मागणीनुसार दर दहा दिवसांनंतर महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून ३० एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता महान धरणाच्या दोन्ही सिंचन व्हॉल्व्हमधून पाणी सोडण्यात आले. पाणी सोडल्यानंतर धरणात २९ टक्के जलसाठा उपलब्ध होता. महान धरणाचे सोडलेले पाणी खांबोरा उन्नई बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास जवळपास दीड ते दोन दिवस लागते. पाणी पोहोचल्यावर महान धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येणार असल्याचे महान पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. धरणातून सोडलेले पाणी ६४ खेडी व मूर्तिजापूर शहर व गुरे-ढोरांसाठी आहे. याचा उपयोग शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामासाठी घेता येणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. महान धरणातून पाण्याचा विसर्ग ३१ मार्चपासून पूर्णपणे बंद करण्यात आला होता; परंतु खांबोरा उन्नई बंधाऱ्यावरून ६४ खेडी गावांसह मूर्तिजापूर शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा असल्याने महान धरणातून सर्वप्रथम १० एप्रिल ,२० एप्रिल व ३० एप्रिल असे एका महिन्यात दर दहा दिवसांनी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. सध्या महान धरणात एकूण २९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे; तसेच अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह बसविलेले असून त्यापैकी दुसरा व्हॉल्व्ह पाण्यावरती उघडा पडला आहे. धरणातील सोडलेले पाणी खांबोरा उन्नई बंधाऱ्यापर्यंत पोहोचल्यावर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडणे बंद करण्यात येईल. धरणातील जलसाठ्याकडे उपविभागीय अधिकारी बोरगाव मंजुचे नितनवरे, शाखा अभियंता सय्यद, जानोरकर, पिंपळकर, पाठक, शिराळे, हातोलकर, अकबर, शहा, अ. अजीज हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत.