शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी विसर्ग!

By admin | Updated: May 2, 2017 01:43 IST

महान- ६४ खेडी गावांना व मूर्तिजापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, करिता मागणीनुसार दर दहा दिवसांनंतर महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

महान : खांबोरा उन्नई बंधाऱ्याची पाणी पातळी खोलवर गेल्याने ६४ खेडी गावांना व मूर्तिजापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, करिता मागणीनुसार दर दहा दिवसांनंतर महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून ३० एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता महान धरणाच्या दोन्ही सिंचन व्हॉल्व्हमधून पाणी सोडण्यात आले. पाणी सोडल्यानंतर धरणात २९ टक्के जलसाठा उपलब्ध होता. महान धरणाचे सोडलेले पाणी खांबोरा उन्नई बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास जवळपास दीड ते दोन दिवस लागते. पाणी पोहोचल्यावर महान धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येणार असल्याचे महान पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. धरणातून सोडलेले पाणी ६४ खेडी व मूर्तिजापूर शहर व गुरे-ढोरांसाठी आहे. याचा उपयोग शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामासाठी घेता येणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. महान धरणातून पाण्याचा विसर्ग ३१ मार्चपासून पूर्णपणे बंद करण्यात आला होता; परंतु खांबोरा उन्नई बंधाऱ्यावरून ६४ खेडी गावांसह मूर्तिजापूर शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा असल्याने महान धरणातून सर्वप्रथम १० एप्रिल ,२० एप्रिल व ३० एप्रिल असे एका महिन्यात दर दहा दिवसांनी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. सध्या महान धरणात एकूण २९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे; तसेच अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह बसविलेले असून त्यापैकी दुसरा व्हॉल्व्ह पाण्यावरती उघडा पडला आहे. धरणातील सोडलेले पाणी खांबोरा उन्नई बंधाऱ्यापर्यंत पोहोचल्यावर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडणे बंद करण्यात येईल. धरणातील जलसाठ्याकडे उपविभागीय अधिकारी बोरगाव मंजुचे नितनवरे, शाखा अभियंता सय्यद, जानोरकर, पिंपळकर, पाठक, शिराळे, हातोलकर, अकबर, शहा, अ. अजीज हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत.