शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

आरटीई प्रवेश प्रक्रिया यावर्षीही रेंगाळणार!

By admin | Updated: March 12, 2016 02:33 IST

शिक्षण विभागात नियोजनाचा अभाव;नवीन तारखा अद्याप घोषित केलेल्या नाहीत.

खामगाव : शाळांची प्रवेश प्रकिया सुरू झाली असली तरी आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया राज्यातील काही जिल्हे वगळता अद्याप सुरू झालेली नाही. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचे नियोजन नसल्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रवेश प्रक्रिया रेंगाळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पूर्वनियोजित तारखेनुसार प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे. आरटीई अँक्ट २00९ मध्ये पारित झाला. यानुसार सर्व मान्यताप्राप्त अनुदानित-विनाअनुदानित शाळांनी पहिल्या वर्गात प्रवेश देताना २५ टक्के जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत, असा दंडक आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने यावर्षीदेखील आरटीईच्या प्रवेशासंदर्भात वेळापत्रक निश्‍चित केले होते. त्यानुसार २७ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत शाळांना आपली नोंदणी करणे आवश्यक होते, तर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ मार्चपासून सुरु होणार होती; मात्र दिलेल्या कालावधीत शाळांची नोंदणी वेबसाइटवरील तांत्रिक अडचणीमुळे अद्याप होऊ शकलेली नाही.वेबसाइटवर नाशिक विभागाकरिता ३ मार्चपासून, तर रायगड जिल्ह्यात ११ मार्चपासून शाळांना नोंदणी करण्यास सांगितले आहे. इतर जिल्ह्यांसाठी मात्र अद्याप तारीख देण्यात आलेली नाही. परिणामी पालक संभ्रमित झाले आहेत. एकीकडे शाळांनी त्यांची नियमित प्रवेश प्रकिया सुरू केली आहे. आरटीईत प्रवेश मिळण्याच्या अपेक्षेत असलेल्या पालकांपुढे मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. आरटीईत प्रवेशासाठी थांबलो, तर खुल्या पद्धतीने प्रवेश मिळण्याची तारीख निघून जाईल. त्यामुळे काय करावे, यावर्षी पालक संभ्रमित आहेत. -प्रवेशासाठी तारीख निश्‍चित नाहीयापूर्वी शिक्षण विभागाने शाळांना नोंदणीसाठी २७ फेब्रुवारी ते ९ मार्च ही तारीख दिली होती, तर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ मार्चपासून सुरू होणार होती; परंतु ११ मार्च उगवला तरी शाळांची नोंद होऊ शकलेली नाही. मग विद्यार्थ्यांनी प्रवेश करायचा केव्हा, हा प्रश्न कायम आहे. नवीन तारखा अद्याप घोषित केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल, याची प्रतीक्षा पालकांना आहे.