शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

आरटीई प्रवेश प्रक्रिया यावर्षीही रेंगाळणार!

By admin | Updated: March 12, 2016 02:33 IST

शिक्षण विभागात नियोजनाचा अभाव;नवीन तारखा अद्याप घोषित केलेल्या नाहीत.

खामगाव : शाळांची प्रवेश प्रकिया सुरू झाली असली तरी आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया राज्यातील काही जिल्हे वगळता अद्याप सुरू झालेली नाही. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचे नियोजन नसल्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रवेश प्रक्रिया रेंगाळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पूर्वनियोजित तारखेनुसार प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे. आरटीई अँक्ट २00९ मध्ये पारित झाला. यानुसार सर्व मान्यताप्राप्त अनुदानित-विनाअनुदानित शाळांनी पहिल्या वर्गात प्रवेश देताना २५ टक्के जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत, असा दंडक आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने यावर्षीदेखील आरटीईच्या प्रवेशासंदर्भात वेळापत्रक निश्‍चित केले होते. त्यानुसार २७ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत शाळांना आपली नोंदणी करणे आवश्यक होते, तर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ मार्चपासून सुरु होणार होती; मात्र दिलेल्या कालावधीत शाळांची नोंदणी वेबसाइटवरील तांत्रिक अडचणीमुळे अद्याप होऊ शकलेली नाही.वेबसाइटवर नाशिक विभागाकरिता ३ मार्चपासून, तर रायगड जिल्ह्यात ११ मार्चपासून शाळांना नोंदणी करण्यास सांगितले आहे. इतर जिल्ह्यांसाठी मात्र अद्याप तारीख देण्यात आलेली नाही. परिणामी पालक संभ्रमित झाले आहेत. एकीकडे शाळांनी त्यांची नियमित प्रवेश प्रकिया सुरू केली आहे. आरटीईत प्रवेश मिळण्याच्या अपेक्षेत असलेल्या पालकांपुढे मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. आरटीईत प्रवेशासाठी थांबलो, तर खुल्या पद्धतीने प्रवेश मिळण्याची तारीख निघून जाईल. त्यामुळे काय करावे, यावर्षी पालक संभ्रमित आहेत. -प्रवेशासाठी तारीख निश्‍चित नाहीयापूर्वी शिक्षण विभागाने शाळांना नोंदणीसाठी २७ फेब्रुवारी ते ९ मार्च ही तारीख दिली होती, तर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ मार्चपासून सुरू होणार होती; परंतु ११ मार्च उगवला तरी शाळांची नोंद होऊ शकलेली नाही. मग विद्यार्थ्यांनी प्रवेश करायचा केव्हा, हा प्रश्न कायम आहे. नवीन तारखा अद्याप घोषित केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल, याची प्रतीक्षा पालकांना आहे.