शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आरटीई प्रवेशाची लाॅटरी लागली, पण तांत्रिक अडचणींमुळे पालकांची निराशा

By atul.jaiswal | Updated: April 18, 2023 16:58 IST

जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेल्या १९० शाळांमध्ये राखीव १९४६ जागांसाठी ७११२ पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी अर्ज केले.

अकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर प्रवेश मिळावा यासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेची निवड यादी १२ एप्रिल रोजी जाहिर आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १९२४ बालकांची लॉटरी लागली, मात्र आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे १८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित झाला नाही.

जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेल्या १९० शाळांमध्ये राखीव १९४६ जागांसाठी ७११२ पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी अर्ज केले. राज्यस्तरावर ५ एप्रिल रोजी सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये १९२४ बालकांची निवड झाली. १२ एप्रिलला आरटीईच्या पोर्टलवर निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांना मेसेज येण्यास प्रारंभ झाला.

बहुतांश पालकांना मेसेज प्राप्त झाला आहे. मात्र आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे अलॉटमेंट लेटर आणि हमी पत्र डाऊनलोड करण्यास अडचण येत आहे. याशिवाय काहींना मेसेज प्राप्त झाले नसल्याने पोर्टलवर खात्री करण्यास देखील तांत्रिक अडथळा निर्माण होत आहे. परिणामी प्रवेश घेता येत नसल्याचे पालकांतून सांगितले जात आहे. त्यामुळे निवड यादी जाहीर झाल्याच्या दिवसापासून एकही प्रवेश निश्चित झाला नसल्याचे आरटीई पोर्टलवर दिसत आहे.

कागदपत्रांची पडताळणी सुरुमोफत प्रवेशासाठी शाळा निश्चित करण्याची डेडलाइन २५ एप्रिल आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात सोमवार, १७ पासून कागदपत्रे पडताळणीला सुरुवात करण्यात आली. कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर शिक्षण विभागामार्फत पालकांना कागदपत्रे पडताळणीची प्रत दिली जाते. ही प्रत निवड झालेल्या शाळेत दाखविल्यानंतरच मुलांचा प्रवेश निश्चित होतो. मात्र, आरटीई पोर्टलमध्ये तांत्रिक कारणांमुळे पालकांना अलॉटमेंट लेटर व पावती मिळण्यात अडचणी येत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणAkolaअकोला