शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

कोरोनामुळे पालक गमावलेल्या ६८ बालकांच्या खात्यात दरमहा जमा होणार ११०० रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

अकोला : कोरोना काळात गत मे अखेरपर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात ८७ बालकांचे पालक गमावले असून, त्यापैकी जून अखेरपर्यंत ...

अकोला : कोरोना काळात गत मे अखेरपर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात ८७ बालकांचे पालक गमावले असून, त्यापैकी जून अखेरपर्यंत ६८ बालक बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. कोरोनामुळे पालक गमावलेल्या या बालकांच्या बॅंक खात्यात दरमहा १ हजार १०० रुपयांचे आर्थिक साहाय्य जमा करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे गत मे अखेरपर्यंत जिल्ह्यात १८ वर्षाआतील ८७ बालकांचे पालक गमावले. त्यामध्ये काहींची आई तर काहींच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे पालकांचे छत्र हरवलेल्या बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी जून अखेरपर्यंत ६८ बालकांना बालकल्याण समितीमार्फत पात्र ठरविण्यात आले. त्यामुळे बालसंगोपन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील ६८ बालकांच्या बॅंक खात्यात दरमहा १ हजार १०० रुपये आर्थिक साहाय्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

१९ बालकांचे प्रस्ताव बालकल्याण समितीकडे सादर!

कोरोनामुळे जिल्ह्यात मे अखेरपर्यंत ८७ बालकांचे पालक गमावले. त्यापैकी जून अखेरपर्यंत ६८ बालकांना बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले असून, उर्वरित १९ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित बालकांचा प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत बालकल्याण समितीकडे सादर करण्यात आला आहे.

१८ वर्षापर्यंतच मिळणार

योजनेचा लाभ!

काेरोना विषाणू संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांना बालसंगोपन योजनेंतर्गत दरमहा १ हजार १०० रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेत वयाच्या १८ वर्षापर्यंतच बालकांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

कोरोनामुळे मे अखेरपर्यंत जिल्ह्यात ८७ बालकांचे पालक गमावले असून, त्यापैकी आतापर्यंत ६७ बालकांना बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले असून, दरमहा १ हजार १०० रुपयांचे आर्थिक साहाय्य त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित १९ बालकांना योजनेचा लाभ देण्यासाठी बालकल्याण समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

विलास मरसाळे

जिल्हा महिला बालविकास अधिकारी