शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

शेतात सडतोय भाजीपाला; लाखोंचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 10:19 IST

Akola News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच सडत असून, लाखो रुपयांचा फटका बसत आहे.

अकोला : कोरोनाच्या संकटामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लावले आहेत. यामध्ये भाजीपाला व फळांची विक्री बंद ठेवण्यात आली आहे. यासोबत भाजीबाजार बंद आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच सडत असून, लाखो रुपयांचा फटका बसत आहे.

जिल्ह्यामध्ये आधीच आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला; परंतु कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाजीबाजार बंद आहे. रस्त्यावर भाजीपाला विक्रीसुद्धा ठप्प आहे. भाजीपाला विकावा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. परिणामी, भाजीपाला शेतात सडत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात हजारो क्विंटल भाजीपाला शेतात पडून आहे.

 

या जिल्ह्यातूनही येतो भाजीपाला

शहरातील भाजीबाजारात अकोला जिल्ह्यासह बुलडाणा, वाशिम, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी येतो, तसेच याच जिल्ह्यांमधील व्यापारी भाजीपाला खरेदीसाठी येतात. बाजार बंद असल्याचे अर्थचक्र ठप्प झाले आहे.

 

माल घ्यायला कोणी तयार नाही!

भाजी बाजार बंद असल्याने उत्पादित केलेला माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. खरेदी केला तर तो विकायचा कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या सगळ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे. बहुतांश शेतकऱ्यांवर भाजीपाला शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे.

 

भाजीपाला शेतातच पडून

शेतकऱ्यांचा भाजीपाला मोठ्या प्रमाणावर शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचा तोडाच केलेला नाही किंवा माल काढलेला नाही. कोणी खरेदी करायला तयार नसल्याने बहुतांश भाजीपाला शेतात सडत आहे.

 

दररोज १००-१२० क्विंटल होती आवक

आठवडी बाजार बंद असल्याने भाजी बाजारात भाजीपाल्याची उलाढाल निम्म्यावर आली आहे. दररोज केवळ १००-१२० क्विंटल आवक होत होती; मात्र भाजीबाजार बंद असल्याने ही सर्व आवक बंद आहे.

 

निर्बंधांमुळे भाजीबाजार बंद आहे. भाजीपाला विक्री करावा तरी कसा, असा प्रश्न पडला आहे. सर्व भाजीपाला शेतात खराब होत आहे. मोठ्या आशेने ४ एकर कोबी, २ एकर टोमॅटो लावले होते. लवकरच भाजीपाला विक्री न झाल्यास फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

- दामोदर बर्डे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, देऊळगाव

 

शेतात भेंडी, काकडीची लागवड केली होती. दर चांगले मिळेल अशी आशा होती; परंतु निर्बंधांमुळे भाजीपाला विक्री बंद आहे. परिणामी, भेंडीचे पीक तोडून फेकावे लागले. काही गावांत मोफत वाटप करून टाकले.

- देवीदास धोत्रे, भाजीपाला उत्पादक शेतकरी

 

 

भाजीबाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीची अडचण येत आहे. जिल्ह्यात बुलडाणा, वाशिम, अमरावती येथून माल येत होता. आता तो बंद आहे.

- अनंता चिंचोळकर, भाजीपाला व्यापारी.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती