शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

रोहयो कंत्राटी कर्मचार्‍यांना तुटपुंजे मानधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:43 IST

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हय़ांमध्ये मानधनावर काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना तुटपुंजे मानधन मिळत असल्याने, कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानुषंगाने मानधनात वाढ करण्याची मागणी रोहयो कंत्राटी कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे केली जात आहे.

ठळक मुद्देकर्मचार्‍यांमध्ये नाराजी  मानधन वाढीची शासनाकडे मागणी

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हय़ांमध्ये मानधनावर काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना तुटपुंजे मानधन मिळत असल्याने, कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानुषंगाने मानधनात वाढ करण्याची मागणी रोहयो कंत्राटी कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे केली जात आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतस्तर आणि यंत्रणांकडून करण्यात येणार्‍या विविध कामांच्या अंमलबजावणीचे काम कंत्राटी तत्त्वावरील कर्मचार्‍यांकडून करण्यात येते. राज्यात जिल्हा ते ग्रामपंचायतस्तरावर कंत्राटी तत्त्वावर काम करणार्‍या या कर्मचार्‍यांना दरमहा मिळणारे मानधन तुटपुंजे असून, दरमहा कमी मिळणारे मानधनही वेळेवर मिळत नाही. कामाच्या तुलनेत मानधन मिळत नसल्याने, रोहयो अंतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दरमहा मिळणार्‍या मानधनात वाढ करण्याची मागणी रोहयो कंत्राटी कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे करण्यात येत आहे. 

कंत्राटी कर्मचार्‍यांच्या कामाचे स्वरूप!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचार्‍यांकडून जिल्हानिहाय कामांची अंमलबजावणी करण्याचे काम करण्यात येते. त्यामध्ये प्रामुख्याने कामांचे नियोजन, समन्वय, संबंधित यंत्रणेच्या अधिकार्‍यांना मदत करणे, रोहयो कामांवरील मजुरांना मजुरी प्रदान करणे, कामांच्या नोंदी, अहवाल तयार इत्यादी प्रकारची कामे केली जातात.

राज्यात असे आहेत कंत्राटी कर्मचारी!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हय़ांमध्ये ३ हजार ५00 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये जिल्हास्तरावर जिल्हा एमआयएस समन्वयक, समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, तालुकास्तरावर सहायक कार्यक्रम अधिकारी, पालक तांत्रिक अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि ग्राम रोजगारसेवक इत्यादी संवर्गातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कंत्राटी तत्त्वावरील या कर्मचार्‍यांना संवर्गनिहाय दरमहा १६ हजार रुपये ते ८ हजार रुपयांपर्यंत मानधन देण्यात येते.