शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रोहयो कंत्राटी कर्मचार्‍यांना तुटपुंजे मानधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:43 IST

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हय़ांमध्ये मानधनावर काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना तुटपुंजे मानधन मिळत असल्याने, कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानुषंगाने मानधनात वाढ करण्याची मागणी रोहयो कंत्राटी कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे केली जात आहे.

ठळक मुद्देकर्मचार्‍यांमध्ये नाराजी  मानधन वाढीची शासनाकडे मागणी

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हय़ांमध्ये मानधनावर काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना तुटपुंजे मानधन मिळत असल्याने, कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानुषंगाने मानधनात वाढ करण्याची मागणी रोहयो कंत्राटी कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे केली जात आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतस्तर आणि यंत्रणांकडून करण्यात येणार्‍या विविध कामांच्या अंमलबजावणीचे काम कंत्राटी तत्त्वावरील कर्मचार्‍यांकडून करण्यात येते. राज्यात जिल्हा ते ग्रामपंचायतस्तरावर कंत्राटी तत्त्वावर काम करणार्‍या या कर्मचार्‍यांना दरमहा मिळणारे मानधन तुटपुंजे असून, दरमहा कमी मिळणारे मानधनही वेळेवर मिळत नाही. कामाच्या तुलनेत मानधन मिळत नसल्याने, रोहयो अंतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दरमहा मिळणार्‍या मानधनात वाढ करण्याची मागणी रोहयो कंत्राटी कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे करण्यात येत आहे. 

कंत्राटी कर्मचार्‍यांच्या कामाचे स्वरूप!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचार्‍यांकडून जिल्हानिहाय कामांची अंमलबजावणी करण्याचे काम करण्यात येते. त्यामध्ये प्रामुख्याने कामांचे नियोजन, समन्वय, संबंधित यंत्रणेच्या अधिकार्‍यांना मदत करणे, रोहयो कामांवरील मजुरांना मजुरी प्रदान करणे, कामांच्या नोंदी, अहवाल तयार इत्यादी प्रकारची कामे केली जातात.

राज्यात असे आहेत कंत्राटी कर्मचारी!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हय़ांमध्ये ३ हजार ५00 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये जिल्हास्तरावर जिल्हा एमआयएस समन्वयक, समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, तालुकास्तरावर सहायक कार्यक्रम अधिकारी, पालक तांत्रिक अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि ग्राम रोजगारसेवक इत्यादी संवर्गातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कंत्राटी तत्त्वावरील या कर्मचार्‍यांना संवर्गनिहाय दरमहा १६ हजार रुपये ते ८ हजार रुपयांपर्यंत मानधन देण्यात येते.