शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

जिल्हयातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’ची कामे ठप्प !

By संतोष येलकर | Updated: May 8, 2023 17:25 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि विविध शासकीय यंत्रणांमार्फत कामे केली जातात.

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (रोहयो ) अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावरील कामांवर गटविकास अधिकारी(बीडीओ) सहायक गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनी बहिष्कार असल्याने, जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्यास्तरावरील ‘रोहयो’ची कामे ठप्प झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनात गेल्या महिनाभरापासून जिल्हयात ग्रामपंचायतस्तरावरील ‘रोहयो’ ची कामे अडकली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि विविध शासकीय यंत्रणांमार्फत कामे केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतींच्या स्तरावरील मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येतात.

कामांची अंमलबजावणी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेमार्फत केली जाते; परंतु पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी (नरेगा) आदींसह महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी गेल्या १० एप्रिलपासून ‘रोहयो’च्या कामांवर बहिष्कार टाकत असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये ‘रोहयो ’ कामांच्या मजुरी मस्टरवर स्वाक्षरीसह नवीन कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ठप्प असल्याने, संबंधित अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनात गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील ‘रोहयो’ ची विविध कामे अडकली आहेत. महिनाभराचा कालावधी उलटून जात असला तरी, जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या स्तरावरील ‘रोहयो’ची कामे ठप्पच असल्याचे वास्तव आहे.

तालुकानिहाय अशी आहे ग्रामपंचायतींची संख्या

तालुका            ग्रा.पं.अकोला            ९७

अकोट             ८५बाळापूर ६६

बार्शीटाकळी ८२मूर्तिजापूर ८६

पातूर             ५७तेल्हारा ६२

घरकुल, पाणंद रस्त्यांसह विविध कामे ठप्प 

जिल्ह्यात गेल्या ११ एप्रिलपासून ग्रामपंचायत स्तरावरील रोहयोची कामे ठप्प आहेत. त्यामध्ये घरकुल, मातोश्री शेतपाणंद रस्ते कामांसह सिंचन विहीर, विहिरींचे पुनर्भरण, शोषखड्डे, वृक्षसंगोपन, गुरांचे गोठे, चंदन लागवड, शेळी व कुक्कुटपालन शेड आदी कामे ठप्प आहेत.

यंत्रणांची केवळ ५६ कामे सुरूरोहयोंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावरील विविध कामे ठप्प असून, शासनाच्या विविध यंत्रणांची केवळ ५६ कामे सुरू असून, त्यावर ६४२ मजूर काम करत असल्याचे चित्र आहे.

काम कसे करणार?पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचा रोहयो कामांवर बहिष्कार असल्याने, कामांच्या मजुरी मस्टरला मंजुरी मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो कामांवरील मजुरांना मजुरी मिळत नाही. त्यामुळे ‘रोहयो’ चे काम कसे करणार, याबाबत मजुरांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Akolaअकोला