शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

अडवलेले शेतीच्या वहिवाटीचे रस्ते होणार मोकळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 14:00 IST

अकोला : शेतात जाणे-येणे करण्यासाठी शेतरस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसह शेतीच्या वहिवाटीचे अडवलेले रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्राप्त अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचा अभिनव उपक्रम अकोला तालुक्यात राबविण्यात येणार आहे.

- संतोष येलकर

अकोला : शेतात जाणे-येणे करण्यासाठी शेतरस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसह शेतीच्या वहिवाटीचे अडवलेले रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्राप्त अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचा अभिनव उपक्रम अकोला तालुक्यात राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात तहसीलदार विजय लोखंडे यांनी २ मे रोजी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे शेतीच्या वहिवाटीचे अडवलेले रस्ते मोकळे होणार असून, शेतरस्त्यांचा मार्ग सुकर होणार आहे.शेतात जाणे-येणे करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी तसेच शेतीच्या वहिवाटीचे अडवलेले रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तहसील कार्यालयाकडे अर्ज प्राप्त होतात. शेतरस्ता मागणीसाठी शेतकºयाने केलेला अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार मंजूर करण्यात येतो; तसेच शेतीच्या वहिवाटीचा अडविलेला रस्ता मोकळा करण्यासाठी मामलतदार अधिनियम १९०८ चे कलम ५ नुसार तरतूद आहे; परंतु शेतीसाठी नवीन रस्ता मागणीसाठी आणि अडविलेला वहिवाटीचा रस्ता मोकळा करण्याकरिता शेतकºयांना तहसील कार्यालयात अर्ज करण्यापासून ते प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतरस्ता मागणीसाठी आणि अडवलेले शेतीच्या वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्यासाठी प्राप्त झालेले अर्ज तातडीने निकाली काढण्याचा उपक्रम अकोला तालुक्यात राबविण्यात येणार असल्याचे परिपत्रक अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी २ मे रोजी काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतरस्त्यांचा मार्ग सुकर होणार आहे.अशी होणार कार्यवाही !शेतीसाठी रस्ता मागणीकरिता प्राप्त अर्जांची संबंधित महसूल मंडळ अधिकारी चौकशी करून प्रत्यक्ष मोक्याच्या ठिकाणी जातील आणि मंडळ अधिकारी व तलाठी शेतीच्या वहितीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करतील. यासंदर्भात पंचनामा तयार करून संबंधितांना देण्यात येणार आहे, तसेच अडविलेली शेतीची वहिवाट मोकळी करण्यासंदर्भात अर्जदार व गैरअर्जदारांच्या समक्ष मंडळ अधिकारी व तलाठी स्थळ निरीक्षण करतील आणि पंचनामा करून वहिवाट मोकळी करण्याची कार्यवाही करतील. अर्ज प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत अर्ज निकाली काढणे आवश्यक आहे, असे तहसीलदारांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती