शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

रस्ते झाले निसरडे; अकोलेकरांनो जपून वाहने चालवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 15:43 IST

चिखलमय झालेल्या रस्त्यावरून दुचाकीसह चारचाकी वाहनेसुद्धा घसरत आहेत.

अकोला: नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील विकास कामे अकोलेकरांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौकपर्यंत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली असून, रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर कंत्राटदाराने साफसफाई न केल्यामुळे आजरोजी रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. चिखलमय झालेल्या रस्त्यावरून दुचाकीसह चारचाकी वाहनेसुद्धा घसरत आहेत. यामुळे अकोलेकरांचा जीव धोक्यात सापडला असून, अशा निसरड्या रस्त्यांवरून वाहने सावकाश चालविण्याची गरज निर्माण झाली आहे.आजरोजी शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. ही कामे होत असताना रस्त्याचे खोदकाम होऊन काही दिवस-त्रास सहन करावा लागेल, याची अकोलेकरांना जाण आहे; परंतु ही कामे करताना साहजिकच संबंधित प्रशासकीय यंत्रणा, कंत्राटदार आणि सर्वात महत्त्वाचे लोकप्रतिनिधींनी नियोजन करणे भाग आहे. शहरातील विकास कामांचा अनुशेष दूर व्हावा, यासाठी भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी खेचून आणत असले तरी रस्त्यांचे दर्जाहीन निर्माण होत असल्यामुळे शासनाच्या निधीची केवळ लयलूट सुरू असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये खदान पोलीस ठाणे ते अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौकपर्यंत उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्या जात असतानाच संबंधित कंत्राटदाराने त्या ठिकाणी साफसफाई करून माती उचलण्याची गरज आहे. तसे होत नसल्यामुळे ऐन पावसाळ््यात खदान पोलीस ठाणे ते थेट रेल्वे स्टेशन चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू निसरड्या झाल्या आहेत. या मार्गावर सर्वाधिक वर्दळ राहते. त्यावरून वाहने चालविताना अकोलेकरांना कसरत करावी लागत असून, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका