शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

रस्ते झाले निसरडे; अकोलेकरांनो जपून वाहने चालवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 15:43 IST

चिखलमय झालेल्या रस्त्यावरून दुचाकीसह चारचाकी वाहनेसुद्धा घसरत आहेत.

अकोला: नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील विकास कामे अकोलेकरांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौकपर्यंत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली असून, रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर कंत्राटदाराने साफसफाई न केल्यामुळे आजरोजी रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. चिखलमय झालेल्या रस्त्यावरून दुचाकीसह चारचाकी वाहनेसुद्धा घसरत आहेत. यामुळे अकोलेकरांचा जीव धोक्यात सापडला असून, अशा निसरड्या रस्त्यांवरून वाहने सावकाश चालविण्याची गरज निर्माण झाली आहे.आजरोजी शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. ही कामे होत असताना रस्त्याचे खोदकाम होऊन काही दिवस-त्रास सहन करावा लागेल, याची अकोलेकरांना जाण आहे; परंतु ही कामे करताना साहजिकच संबंधित प्रशासकीय यंत्रणा, कंत्राटदार आणि सर्वात महत्त्वाचे लोकप्रतिनिधींनी नियोजन करणे भाग आहे. शहरातील विकास कामांचा अनुशेष दूर व्हावा, यासाठी भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी खेचून आणत असले तरी रस्त्यांचे दर्जाहीन निर्माण होत असल्यामुळे शासनाच्या निधीची केवळ लयलूट सुरू असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये खदान पोलीस ठाणे ते अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौकपर्यंत उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्या जात असतानाच संबंधित कंत्राटदाराने त्या ठिकाणी साफसफाई करून माती उचलण्याची गरज आहे. तसे होत नसल्यामुळे ऐन पावसाळ््यात खदान पोलीस ठाणे ते थेट रेल्वे स्टेशन चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू निसरड्या झाल्या आहेत. या मार्गावर सर्वाधिक वर्दळ राहते. त्यावरून वाहने चालविताना अकोलेकरांना कसरत करावी लागत असून, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका