शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

मुख्यंमत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम अर्धवट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क निहिदा : पिंजर परिसरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम गत तीन ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

निहिदा : पिंजर परिसरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम गत तीन ते चार वर्षांपासून अर्धवट स्थितीत असल्याने ग्रामस्थांसह वाहनचालक वैतागले आहेत. रस्त्यावर गीट्टी, मुरुम टाकल्याने या मार्गाने प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पिंजर परिसरातील खोपडी-मालशेलू, पिंजर-निहिदा, निहीदा-सावरखेड फाटा या रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. या रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून पिंजर परिसरातील खोपडी-मालशेलू, पिंजर-निहिदा, निहिदा-सावरखेड फाटा रस्त्यांचे काम अपूर्ण असून, या रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी देऊनही परिस्थिती जैसे थे असल्याने ग्रामस्थांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. निहिदा-पिंजर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत सरपंच मीना अविनाश ठाकरे, माजी सरपंच विजय पाटील-ठाकरे, बहिरखेडच्या सरपंच कविता किरण पाटील-ठाकरे यांनी तक्रारी केल्या; मात्र सद्यस्थितीतही काम जैसे थे आहे. खोपडी-मालशेलू रस्त्याची तक्रार प्रदीप राठोड, पिंजर-बार्शीटाकळी रस्त्याची तक्रार शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील-मानतकर यांनी केली असल्याची माहिती आहे. रस्त्यांचे काम चांगल्या दर्जाचे करून त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना संपर्क केला असता, होऊ शकला नाही.

---------------------------------------

पिंजर-निहिदा रस्त्याचे काम चार वर्षांपासून अपूर्ण आहे. याबाबत तक्रारी केल्या; मात्र कारवाई झाली नाही. अपूर्ण रस्त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

- मीना अविनाश ठाकरे, सरपंच, निहिदा.

---------------------------------------

पिंजर मंडलामधील रस्त्यांचे काम आतापर्यंत पूर्ण करायला हवे होते. रस्त्यांचे काम निकृष्ट झाले असेल तर चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

- प्रदीप खवले, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, अमरावती.

---------------------------------------------------------

खोपडी - मालशेलू रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. याबाबत तक्रार करूनही चौकशी करण्यात येत नाही. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

- प्रदीप राठोड, ग्रामस्थ, मालशेलू.