शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मुख्यंमत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम अर्धवट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क निहिदा : पिंजर परिसरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम गत तीन ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

निहिदा : पिंजर परिसरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम गत तीन ते चार वर्षांपासून अर्धवट स्थितीत असल्याने ग्रामस्थांसह वाहनचालक वैतागले आहेत. रस्त्यावर गीट्टी, मुरुम टाकल्याने या मार्गाने प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पिंजर परिसरातील खोपडी-मालशेलू, पिंजर-निहिदा, निहीदा-सावरखेड फाटा या रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. या रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून पिंजर परिसरातील खोपडी-मालशेलू, पिंजर-निहिदा, निहिदा-सावरखेड फाटा रस्त्यांचे काम अपूर्ण असून, या रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी देऊनही परिस्थिती जैसे थे असल्याने ग्रामस्थांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. निहिदा-पिंजर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत सरपंच मीना अविनाश ठाकरे, माजी सरपंच विजय पाटील-ठाकरे, बहिरखेडच्या सरपंच कविता किरण पाटील-ठाकरे यांनी तक्रारी केल्या; मात्र सद्यस्थितीतही काम जैसे थे आहे. खोपडी-मालशेलू रस्त्याची तक्रार प्रदीप राठोड, पिंजर-बार्शीटाकळी रस्त्याची तक्रार शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील-मानतकर यांनी केली असल्याची माहिती आहे. रस्त्यांचे काम चांगल्या दर्जाचे करून त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना संपर्क केला असता, होऊ शकला नाही.

---------------------------------------

पिंजर-निहिदा रस्त्याचे काम चार वर्षांपासून अपूर्ण आहे. याबाबत तक्रारी केल्या; मात्र कारवाई झाली नाही. अपूर्ण रस्त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

- मीना अविनाश ठाकरे, सरपंच, निहिदा.

---------------------------------------

पिंजर मंडलामधील रस्त्यांचे काम आतापर्यंत पूर्ण करायला हवे होते. रस्त्यांचे काम निकृष्ट झाले असेल तर चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

- प्रदीप खवले, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, अमरावती.

---------------------------------------------------------

खोपडी - मालशेलू रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. याबाबत तक्रार करूनही चौकशी करण्यात येत नाही. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

- प्रदीप राठोड, ग्रामस्थ, मालशेलू.