शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

१६ लाख जनावरांना ‘समर फिव्हर’चा धोका

By admin | Updated: May 7, 2015 01:48 IST

पश्‍चिम व-हाडात उन्हाचा पारा वाढला; तळपत्या उन्हाचा पशुधनाला फटका.

ब्रह्मनंद जाधव /मेहकर : पश्‍चिम वर्‍हाडात आधीच दुष्काळाचे सावट गडद झालेले आहे. त्यात उन्हाचा पाराही उच्चांक गाठत आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील कमाल तापमान ४0 अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने १६ लाख जनावरांना 'समर फिव्हर'चा धोका निर्माण झाला आहे. तळपत्या उन्हाचा पशुधनाला फटका बसत असून, मुके प्राणी यात होरपळून निघत आहेत. पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. उन्हापासून मानव विविध मार्गांंनी आपला बचाव करून घेऊ शकतात; परंतु जनावरांना या कडाक्याच्या उन्हाचा फटका बसत आहे. चारा व पाणीटंचाईमुळे पश्‍चिम वर्‍हाडातील जनावरांची रानोमाळ भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची व ओल्या चार्‍याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. अकोला जिल्ह्यात २ लाख ७७ हजार ८८१, वाशिम जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ३४७ तर बुलडाणा जिल्ह्यात १0 लाख १३ हजार ६८८ जनावरे आहेत. उन्हाच्या तीव्रतेने या जनावरांची प्रजनन क्षमता कमी होणे, वजन घटणे, अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील कमाल तापमान ४0 अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने जनावरांना 'समर फिव्हर'चा धोका निर्माण झाला आहे. पश्‍चिम वर्‍हाडात असलेल्या एकूण १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरांपैकी चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना 'समर फिव्हर'चा फटका बसत आहे.