शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

एकदाही मतदान न चुकवलेल्या ९५ वर्षीय आजोबांची खंत विचार करायला लावेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 19:11 IST

९५ वर्षीय फत्तुजी तायडे यांनी १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले होते. तेव्हापासून फत्तुजी यांनी एकही निवडणुक चुकविली नाही.

अकोला : १९५२ च्या पहिल्या निवडणुकीपासून मतदान करणारे ९५ वर्षीय फत्तुजी नथ्थुजी तायडे(रा. सिंधी कॅम्प) यांनी, प्रकृती बरी नसतानाही, पायांनी चालता येत नसतानाही व्हिलचेअरवर येऊन मुलगा नागपूर येथील जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्या मदतीने गुरूवारी १७ व्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा गुरूनानक विद्यालय मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.

फत्तुजी नथ्थुजी तायडे हे सिंधी कॅम्प परिसरात राहणारे. ९५ वर्षीय फत्तुजी तायडे यांनी १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले होते. तेव्हापासून फत्तुजी यांनी एकही निवडणुक चुकविली नाही. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरूवारी त्यांची प्रकृती बरी नसताना, सुद्धा त्यांचा मुलगा नागपूर येथील जिल्हा पुरवठा अधिकारी असलेले भास्कर तायडे हे त्यांना सिंधी कॅम्प परिसरातील गुरूनानक मतदान केंद्रावर घेऊन आले होते. व्हिलचेअरवर येत, त्यांनी, मतदानाचा हक्क बजावला.

फत्तुजी तायडे यांनी लोकमतशी बोलताना, लोकशाहीने मतदान करण्याचा दिलेला हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे. एकही निवडणुक अशी नाही की, त्यात मी मतदान केले नाही. यंदा प्रकृती बरी नाही. पायांनी चालता येत नाही. परंतु मतदान करण्याची इच्छा असल्यामुळे मुलाने व्हिलचेअरवर आणले आणि मतदान केले. असे सांगत, त्यांनी, आमच्या काळामध्ये निवडणुकीविषयी फारसी जागृती नव्हती. मतदारांची संख्याही फार नव्हती. मोजकेच मतदान केंद्र असायचे. मतदान केंद्रांवर फार सुविधा नव्हत्या. परंतु मतदान करायचेच ही जाणीव मात्र, त्याकाळी होती. उत्साह होता. मुद्यांना आणि मतदारांना केंद्रस्थानी ठेऊन निवडणुक व्हायची. त्याकाळात जात, धर्म हा विषय निवडणुकीत नव्हता आणि आताच्या निवडणुकीमध्ये जात, धर्म, पैशाला महत्व आले आहे. याचा खेद वाटतो. (प्रतिनिधी)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकinterviewमुलाखतakola-pcअकोलाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019