शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

राज्यात १0 लाखांच्यावर तंट्यांचा लागला निकाल

By admin | Updated: November 15, 2014 23:52 IST

तंटामुक्त अभियानाला ग्रामस्थांचा प्रतिसाद.

डॉ. किरण वाघमारे/अकोलाराज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला संपूर्ण राज्यात व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत विविध स्वरूपाचे १0 लाख ७५ हजार ५३१ तंटे मिटविण्यात गावांमधील तंटामुक्त समित्यांना यश आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी तंट्यांचे असून, महसुली तंट्यांचे प्रमाण अल्प आहे. सामोपचाराने तंटे मिटल्यामुळे न्यायालयाचा भार कमी झाला आहे. गावांमधील तंटे गावातच निकाली निघावे, या उद्देशाने २00७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राज्य शासनाने सुरू केली. या उपक्रमाला गावागावांमध्ये व्यापक प्रतिसाद मिळाला. गावांमध्ये तंटामुक्त समित्या स्थापन झाल्या. या समित्यांना न्यायालयाच्या धर्तीवर न्याय निवाडा करण्याचे अधिकार देण्यात आले. जवळपास १५0 गुन्ह्यांवर न्याय देण्याचा अधिकार समितीला प्राप्त झाला. फौजदारी स्वरूपातील गंभीर गुन्हे वगळता इतर सर्व गुन्ह्यांवर न्यायनिवडा करण्याचा अधिकार तंटामुक्त समित्यांना मिळाला. त्यामुळे न्यायालयाची पायरी चढण्याची पाळीच अनेक गावकर्‍यांवर आली नाही. तंटामुक्त मोहिमेला ग्रामस्थांचा भरपूर प्रतिसाद लाभल्यामुळेच आतापर्यंंत वेगवेगळ्या स्वरूपाचे १0 लाख ७५ हजार ५३१ तंटे मिटविण्यात यश मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक तंटे हे फौजदारी स्वरूपाचे आहेत. फौजदारी स्वरूपातील गुन्ह्यात न्यायनिवाडा करण्याचा अधिकार तंटामुक्त समितीला नसला, तरी फौजदारी गुन्हे होऊच नये, या दृष्टीने तंटामुक्त समितीने खबरदारी घेतली. समि तीने फौजदारी तंटे सामोपचाराने गावातल्या गावातच मिटविले आणि न्यायालयाचा वेळ वाचविला. यातून ग्रामस्थांचा पैसा आणि वेळदेखील वाचला. तंटामुक्त मोहीम सुरू झाल्यावर पहिल्या वर्षी २00७-0८ मध्ये २ लाख ५ हजार ११५ तंटे मिटविण्यात आले. पुढील वर्षी २00८-0९ मध्ये २ लाख १८ हजार ८१३ , २00९-१0 मध्ये २ लाख २५ हजार ३0२ तंटे व त्यानंतरच्या काळात १ लाखापेक्षा जास्त फौजदारी तंटे मिटविण्यात आले. याच कालावधीत दिवाणी स्वरूपाचे ६८ हजार २५५ तंटे मिटविण्यात आले. यात पहिल्या वर्षी २0६६३, दुसर्‍या वर्षी १0२२५, तिसर्‍या वर्षी १४६९९ तर चौथ्या वर्षी १६८५७ तंटे मिटविण्यात आले. महसुली स्वरूपाचे ३३ हजार ३९९ तंटे मिटविण्यात समि त्यांना यश आले.