शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ग्रामविकास अधिका-यानेच केली स्वच्छता, सफाई कामगार स्वच्छता करीत नसल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 17:07 IST

स्थनिक ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे अनेक वार्डात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यासंदर्भात महिलांनी ग्रामपंचायतकडे समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई  करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.

डोणगांव : स्थनिक ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे अनेक वार्डात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यासंदर्भात महिलांनी ग्रामपंचायतकडे समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई  करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. याठिकाणी सफाई कामगारही वेळेवर आले नाही; परंतू त्यांची वाट न बघता ग्रामविकास अधिका-यांनी केलेल्या या स्वच्छतेच्या उपक्रमामुळे ग्रामपंचायतचे चित्र बदलले आहे.   महाराष्ट्र शासन जनतेच्या आरोग्यासाठी स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्चून स्वच्छता अभियान राबवित असतानाच डोणगांवमध्ये ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे प्रत्येक वार्डात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महिलांनी ग्रामपंचायत गाठून समस्या मांडताच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी ग्रामपंचायतचे उपसरपंच जुबेरखान, सदस्य साबीरभाई, कासम बागवान यांच्यासह आठवडी बाजार वार्ड नं.सहा ची पाहणी केली. त्यावेळेस त्यांना अस्वच्छता आढळून आली. यावर ग्रामविकास अधिका-यांनी ग्रामपंचायतचे कर्मचारी व कचरा गाडी बोलावून घेतली सफाई कामगार न आल्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांनी हातात फावडे व टोपले घेऊन स्वत:च सफाई कामगारांची भूमिका बजावली. ग्रामविकास अधिकाºयांनी रस्त्यावरील घाण उचलून गाडीत टाकल्याने ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप परमाळे, जीवन खडसे, श्याम खोटे, सचिन पहाडे सह कासम बागवान यांनीही ग्रामविकास अधिका-यास सहाय्य केले.  त्यानंतर कोणीही रस्त्यावर घाण टाकू नका व स्वच्छता अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी गावक-यांना केले. आठवडी बाजारात रस्त्यावर बसून अनेक व्यापा-यांनी अतिक्रमण केल्याने अडथळा निर्माण झाल्याची बाब लक्षात येताच त्यांनी स्वत: कर्मचा-यासह जाऊन अडथळ्याचे अतिक्रमण काढून रस्त्यावर दुकाने थाटल्यास कारवाई केल्या जाईल, अशी सुचनाही रस्त्यावर बसणा-यांना केल्या. त्यामुळे अचानक मरगळ आलेल्या ग्रामपंचायतला ग्रामविकास अधिकाºयाने केलेल्या कामामुळे हुरुप आल्याचे दिसून येत आहे.

अन्यथा सफाई कामगारांवर कारवाईडोणगाव आठवडी बाजार व प्रत्येक वार्डात सफाई कामगाराच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता निर्माण झाल्याने आपण सफाई कामगारांना नोटीस दिल्या असून दोन दिवसात सफाई कामगारांनी सफाई न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे ग्रामसेवक बुरकुल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Akolaअकोला