शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘बंद’ला प्रतिसाद; ठिकठिकाणी रास्ता रोको!

By admin | Updated: June 6, 2017 00:59 IST

व्यापाऱ्यांचाही पाठिंबा : शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले, भाजीपाला फेकला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून ५ जून रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच काही गावांमध्ये पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने बंद शंभर टक्के पाळला गेला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा, दूध व इतर शेतमाल रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध केला. अकोला तालुक्यातील गांधीग्राम, वल्लभनगर, बाभूळगाव जहाँगीरसह अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बाळापूर तालुक्यात व्याळा, वाडेगाव व पारस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पारस येथे व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला. तसेच शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. व्याळा येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस, शिवसेनेने पाठिंबा दिला. तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या ७९ आंदोलकांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली. यामध्ये पारस फाटा येथील ३६, व्याळा १७ आणि वाडेगाव येथील २६ आंदोलकांचा समावेश आहे. तेल्हारा शहरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील मुख्य मार्गावर शेतकऱ्यांनी शेतमाल फेकून शासनाचा निषेध केला. तालुक्यातील खंडाळा गावात बंद, तर खंडाळा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांची रांग लागली होती. बार्शीटाकळी तालुक्यात महान, खेर्डा भागाई येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पिंजर येथे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांसह कृषी सेवा केंद्र संचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथे महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून दूध, कांदा फेकून शासनाचा निषेध केला. पातूर शहरासह तालुक्यातील बाभूळगाव, चान्नी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या बंदला तालुक्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे, तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रं बंद होती. अकोट तालुक्यात वाई फाट्यावर शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर मुंडगाव येथे बंद पाळण्यात आला.मूर्तिजापूरमध्ये आठवडी बाजार आज बंदचे आवाहन मूर्तिजापूर तालुक्यातही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धार वाढली आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून ६ जून रोजी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांनी आपला माल बाजारात विक्रीसाठी आणू नये, तसेच ग्राहकांनी खरेदीसाठी जाऊ नये,असे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे.