शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

‘बंद’ला प्रतिसाद; ठिकठिकाणी रास्ता रोको!

By admin | Updated: June 6, 2017 00:59 IST

व्यापाऱ्यांचाही पाठिंबा : शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले, भाजीपाला फेकला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून ५ जून रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच काही गावांमध्ये पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने बंद शंभर टक्के पाळला गेला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा, दूध व इतर शेतमाल रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध केला. अकोला तालुक्यातील गांधीग्राम, वल्लभनगर, बाभूळगाव जहाँगीरसह अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बाळापूर तालुक्यात व्याळा, वाडेगाव व पारस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पारस येथे व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला. तसेच शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. व्याळा येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस, शिवसेनेने पाठिंबा दिला. तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या ७९ आंदोलकांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली. यामध्ये पारस फाटा येथील ३६, व्याळा १७ आणि वाडेगाव येथील २६ आंदोलकांचा समावेश आहे. तेल्हारा शहरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील मुख्य मार्गावर शेतकऱ्यांनी शेतमाल फेकून शासनाचा निषेध केला. तालुक्यातील खंडाळा गावात बंद, तर खंडाळा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांची रांग लागली होती. बार्शीटाकळी तालुक्यात महान, खेर्डा भागाई येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पिंजर येथे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांसह कृषी सेवा केंद्र संचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथे महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून दूध, कांदा फेकून शासनाचा निषेध केला. पातूर शहरासह तालुक्यातील बाभूळगाव, चान्नी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या बंदला तालुक्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे, तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रं बंद होती. अकोट तालुक्यात वाई फाट्यावर शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर मुंडगाव येथे बंद पाळण्यात आला.मूर्तिजापूरमध्ये आठवडी बाजार आज बंदचे आवाहन मूर्तिजापूर तालुक्यातही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धार वाढली आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून ६ जून रोजी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांनी आपला माल बाजारात विक्रीसाठी आणू नये, तसेच ग्राहकांनी खरेदीसाठी जाऊ नये,असे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे.