शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

जनता दरबारातून ६०३६ तक्रारींचे निवारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:58 IST

६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले.

अकोला: गेल्या २४ महिन्यात घेण्यात आलेल्या ३९ जनता दरबारात विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी-समस्यांचे निवारण करण्यासाठी गत २४ महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्यात १५ दिवसातून एकदा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जनता दरबार घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. १९ आॅगस्टपर्यंत घेण्यात आलेल्या ३९ जनता दरबारात विविध ३६ विभागांसंबंधी ६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या. जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, त्यासंदर्भात अनुपालन अहवाल प्राप्त झाले आहेत. जनता दरबारात नागरिकांकडून सर्वात जास्त तक्रारी प्राप्त होणाऱ्या चार विभागांमध्ये महसूल, जिल्हा परिषद, महानगरपालिका व पोलीस विभागाचा समावेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. जनता दरबार उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सावकारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच शेतरस्त्यांची कामे व अतिक्रमणे हटविण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले, सामूहिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला, असेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर उपस्थित होते.‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’साठी ४६५ पदांना मान्यता!अकोल्यातील ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’साठी ४६५ पदांच्या आकृतीबंधाला शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील