शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

जनता दरबारातून ६०३६ तक्रारींचे निवारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:58 IST

६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले.

अकोला: गेल्या २४ महिन्यात घेण्यात आलेल्या ३९ जनता दरबारात विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी-समस्यांचे निवारण करण्यासाठी गत २४ महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्यात १५ दिवसातून एकदा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जनता दरबार घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. १९ आॅगस्टपर्यंत घेण्यात आलेल्या ३९ जनता दरबारात विविध ३६ विभागांसंबंधी ६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या. जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, त्यासंदर्भात अनुपालन अहवाल प्राप्त झाले आहेत. जनता दरबारात नागरिकांकडून सर्वात जास्त तक्रारी प्राप्त होणाऱ्या चार विभागांमध्ये महसूल, जिल्हा परिषद, महानगरपालिका व पोलीस विभागाचा समावेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. जनता दरबार उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सावकारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच शेतरस्त्यांची कामे व अतिक्रमणे हटविण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले, सामूहिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला, असेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर उपस्थित होते.‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’साठी ४६५ पदांना मान्यता!अकोल्यातील ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’साठी ४६५ पदांच्या आकृतीबंधाला शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील