शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जनता दरबारातून ६०३६ तक्रारींचे निवारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:58 IST

६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले.

अकोला: गेल्या २४ महिन्यात घेण्यात आलेल्या ३९ जनता दरबारात विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी-समस्यांचे निवारण करण्यासाठी गत २४ महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्यात १५ दिवसातून एकदा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जनता दरबार घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. १९ आॅगस्टपर्यंत घेण्यात आलेल्या ३९ जनता दरबारात विविध ३६ विभागांसंबंधी ६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या. जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, त्यासंदर्भात अनुपालन अहवाल प्राप्त झाले आहेत. जनता दरबारात नागरिकांकडून सर्वात जास्त तक्रारी प्राप्त होणाऱ्या चार विभागांमध्ये महसूल, जिल्हा परिषद, महानगरपालिका व पोलीस विभागाचा समावेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. जनता दरबार उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सावकारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच शेतरस्त्यांची कामे व अतिक्रमणे हटविण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले, सामूहिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला, असेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर उपस्थित होते.‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’साठी ४६५ पदांना मान्यता!अकोल्यातील ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’साठी ४६५ पदांच्या आकृतीबंधाला शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील