शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

देशात १५० सर्वोदयी ग्राम निर्माण करण्याचा संकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 15:13 IST

अकोला : महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या वर्षात गांधी विचारांच्या प्रसार-प्रचाराच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आले असून, गांधी विचारांनी भारावलेले तरुण देशभरातील १५० गावांना सर्वोदयी ग्राम करण्यासाठी संकल्पबद्ध झाले आहेत.

ठळक मुद्दे बा-बापू १५० व्या जयंतीच्या अनुषंगाने बोबडे यांचा विदर्भ दौरा अकोल्यापासून सुरू झाला. वाढती हिंसा व क्रूरता वाढीस लागत असताना गांधींची अहिंसा समाजाला दीपस्तंभासारखी वाटते.बा-बापू १५० व्या जयंतीनिमित्त होणारे हे सर्व कार्यक्रम उत्सवी नसतील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे.

अकोला : महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या वर्षात गांधी विचारांच्या प्रसार-प्रचाराच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आले असून, गांधी विचारांनी भारावलेले तरुण देशभरातील १५० गावांना सर्वोदयी ग्राम करण्यासाठी संकल्पबद्ध झाले आहेत. यापैकी ३० गावांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले असल्याची माहिती गांधीवादी विचारवंत तसेच जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनचे भुजंग बोबडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बा-बापू १५० व्या जयंतीच्या अनुषंगाने बोबडे यांचा विदर्भ दौरा अकोल्यापासून सुरू झाला असून, गुरुवारी त्यांनी लोकमत कार्यालयात भेट देऊन संवाद साधला. बोबडे म्हणाले, की महात्मा गांधींचा विचार हा सर्वकालीन विचार आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही गांधी विचारांची गरज अन् उपयुक्तता अधिक वाढताना दिसत आहे. कारण गांधी विचार हा प्रकाश देणारा विचार आहे. ज्या ज्या वेळी अंधार अधिक होत जाईल, त्यावेळी प्रकाशाचे महत्त्व अधिक वाढते, तसा हा विचार आहे. त्यामुळेच वाढती हिंसा व क्रूरता वाढीस लागत असताना गांधींची अहिंसा समाजाला दीपस्तंभासारखी वाटते. गांधींचा विचार हा मानवतावादी विचार आहे, त्यामुळे तोच धागा पकडून बा-बापूंच्या १५० जयंतीनिमित्ताने मानवतावादी विचारांचा प्रसार-प्रचार करण्याचे काम हाती घेतल्याचे ते म्हणाले. गांधी विचार संस्कार परीक्षा हा त्याचा एक भाग आहे. आजपर्यंत १४ लाख विद्यार्थ्यांसह नागरिकांनी ही परीक्षा दिली आहे. अरुण गवळी यांच्यासारख्या तुरुंगात असलेल्या कैद्यानेही गांधी विचार संस्कार परीक्षेत सहभाग घेऊन अहिंसा हेच खरे शस्त्र असल्याचे एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गांधींचा मानवतावादी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, प्रदर्शन, ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी कीर्तन अशा विविध माध्यमांचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बा-बापू १५० व्या जयंतीनिमित्त होणारे हे सर्व कार्यक्रम उत्सवी नसतील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. उत्सवांपेक्षा कृतीवर भर, गांधींच्या संदर्भात असलेल्या गैरसमजुती दूर करणे, त्यांच्याबाबत होणाºया खोट्या आरोपांना पुरारव्यानिशी उत्तर देणे यावर भर दिला जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधी