शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

देशात १५० सर्वोदयी ग्राम निर्माण करण्याचा संकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 15:13 IST

अकोला : महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या वर्षात गांधी विचारांच्या प्रसार-प्रचाराच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आले असून, गांधी विचारांनी भारावलेले तरुण देशभरातील १५० गावांना सर्वोदयी ग्राम करण्यासाठी संकल्पबद्ध झाले आहेत.

ठळक मुद्दे बा-बापू १५० व्या जयंतीच्या अनुषंगाने बोबडे यांचा विदर्भ दौरा अकोल्यापासून सुरू झाला. वाढती हिंसा व क्रूरता वाढीस लागत असताना गांधींची अहिंसा समाजाला दीपस्तंभासारखी वाटते.बा-बापू १५० व्या जयंतीनिमित्त होणारे हे सर्व कार्यक्रम उत्सवी नसतील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे.

अकोला : महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या वर्षात गांधी विचारांच्या प्रसार-प्रचाराच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आले असून, गांधी विचारांनी भारावलेले तरुण देशभरातील १५० गावांना सर्वोदयी ग्राम करण्यासाठी संकल्पबद्ध झाले आहेत. यापैकी ३० गावांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले असल्याची माहिती गांधीवादी विचारवंत तसेच जळगावच्या गांधी रिसर्च फाउंडेशनचे भुजंग बोबडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बा-बापू १५० व्या जयंतीच्या अनुषंगाने बोबडे यांचा विदर्भ दौरा अकोल्यापासून सुरू झाला असून, गुरुवारी त्यांनी लोकमत कार्यालयात भेट देऊन संवाद साधला. बोबडे म्हणाले, की महात्मा गांधींचा विचार हा सर्वकालीन विचार आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही गांधी विचारांची गरज अन् उपयुक्तता अधिक वाढताना दिसत आहे. कारण गांधी विचार हा प्रकाश देणारा विचार आहे. ज्या ज्या वेळी अंधार अधिक होत जाईल, त्यावेळी प्रकाशाचे महत्त्व अधिक वाढते, तसा हा विचार आहे. त्यामुळेच वाढती हिंसा व क्रूरता वाढीस लागत असताना गांधींची अहिंसा समाजाला दीपस्तंभासारखी वाटते. गांधींचा विचार हा मानवतावादी विचार आहे, त्यामुळे तोच धागा पकडून बा-बापूंच्या १५० जयंतीनिमित्ताने मानवतावादी विचारांचा प्रसार-प्रचार करण्याचे काम हाती घेतल्याचे ते म्हणाले. गांधी विचार संस्कार परीक्षा हा त्याचा एक भाग आहे. आजपर्यंत १४ लाख विद्यार्थ्यांसह नागरिकांनी ही परीक्षा दिली आहे. अरुण गवळी यांच्यासारख्या तुरुंगात असलेल्या कैद्यानेही गांधी विचार संस्कार परीक्षेत सहभाग घेऊन अहिंसा हेच खरे शस्त्र असल्याचे एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गांधींचा मानवतावादी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, प्रदर्शन, ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी कीर्तन अशा विविध माध्यमांचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बा-बापू १५० व्या जयंतीनिमित्त होणारे हे सर्व कार्यक्रम उत्सवी नसतील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. उत्सवांपेक्षा कृतीवर भर, गांधींच्या संदर्भात असलेल्या गैरसमजुती दूर करणे, त्यांच्याबाबत होणाºया खोट्या आरोपांना पुरारव्यानिशी उत्तर देणे यावर भर दिला जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधी