शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

पैसेवारी कमी करण्याचा घेणार ठराव!

By admin | Updated: October 12, 2015 01:57 IST

शेतक-यांसाठी ग्रामपंचायती सरसावल्या; शासनाकडे करणार पाठपुरावा.

सायखेड (जि. अकोला ): निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत तीन वषार्ंपासून दुष्काळाचा सामना करणार्‍या बाश्रीटाकळी तालुक्यातील शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी आता तालुक्यातील ११ पेक्षा जास्त ग्रामपंचायत सरसावल्या आहेत. शासनाने पैसेवारीचे निकष बदलून ५0 पैशाचे आत पैसेवारी जाहीर करावी आणि दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना न्याय द्यावा, असा ठराव मासिक सभेत घेण्यात येणार आहे. हा ठराव महसूल विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांनी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या सोयाबीनखक पीक फुलोरा अवस्थेत असून, पावसाने दडी मारल्यामुळे उत्पादन कमालीचे घटले आहे. तालुक्यातील बहुतांश भागातील पीक परिस्थिती अत्यंत बिकट असून, मशागत, पेरणी, निंदण, बियाणे, खते, डवरणी, फवारणी आदींवर झालेला खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकरी पुरता खचला आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात धाबा, राजंदा, पिंजर, महान, बाश्रीटाकळी, खेर्डा या सहा महसूल मंडळामध्ये १५९ गावांचा समावेश आहे. धाबा मंडळातील सर्वाधिक गावांना पीक उत्पादनात फटका बसला असून, तालुक्या तील काही भाग वगळता पिकांची स्थिती बिकट आहे. अपुर्‍या पावसामुळे चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शेतकर्‍यांना शासनाकडून भरीव मदत मिळण्यासाठी ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. तालुक्यातील गावांमधील पैसेवारी ५0 पैशाच्या आत जाहीर करून जाहीर करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशा असा ठराव मासिक सभेत घेण्यात येणार आहे.