शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
4
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
5
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
6
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
7
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
8
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
9
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
10
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
11
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
12
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
13
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
14
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
15
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
16
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
17
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
18
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
19
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
20
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
Daily Top 2Weekly Top 5

मातीची धूप थांबविण्यावर संशोधन करा - डॉ. तपस भट्टाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:53 IST

राज्यस्तरीय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

अकोला: दरवर्षी वाहून जाणाऱ्या मातीची धूप थांबविणे काळाची गरज असून, मातीची जलधारण क्षमता वाढविण्यासाठीचे संशोधन करावे लागणार असल्याचे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी मंगळवारी अकोला येथे केले. ‘वातावरण अनुरू प दिशादर्शक कृषी तंत्रज्ञान’ विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नैसर्गिक संसाधन विकास विभागाचे उपमहसंचालक डॉ. एस. के. चौधरी (नवी दिल्ली), राष्टÑीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन संस्थेचे संचालक डॉ. पी. चंद्रण (नागपूर), नेदरलँड येथील सोलीदयरीडेड विद्यापीठाचे वरिष्ठ सहसंचालक डॉ.बरवाह स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवन (परभणी), माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.बरवाह यांची उपस्थिती होती. त्यांनी दिर्घ मुदतीय सेंद्रीय खताचे व्यवस्थापनाचे कापूस पिकावर चांगले दूरगामी परिणार होतात असे सांगितले. विशेष म्हणजे रासायनिक खते कंपन्याचे संचालक या परिषदेला बहुसंख्यने उपस्थित होते. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ३५० शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांसह देशातील शास्त्रज्ञांनी परिषदेत सहभाग घेतला. माती या विषयावर २७५ भित्तीपत्रके येथे लावण्यात आली होती. यातील सर्वोकृ ष्ट इत्थंभूत माहिती असलेली पाच शास्त्रज्ञांच्या पत्रकाची निवड करण्यात आली. दोन पदव्युत्तर व दोन ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांनी याच विषयावर शोधप्रबंध सादर केले. या सर्वांचा येथे सन्मान करण्यात आला.दोन दिवसीय परिषदेत माती, पाणी व बदलते हवामान, या विषयावर शास्त्रज्ञांनी मंथन केले असून, या शिफारशी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे पाठविण्यात येणार आहेत. दरवर्षी लाखो टन सुपीक माती पाण्यासोबत वाहून जात आहे. अनेक भागातील मातीची जलधारणा क्षमता घटली आहे. मातीचे आरोग्य बिघडले आहे. एकूणच यावर तातडीच्या संशोधनाची गरज असल्याचे सर्वच तज्ज्ञांनी अधोरेखित केले.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ