शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मानवी वस्तीलगत वीटभट्टय़ा नसल्याचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:21 IST

अकोला: राष्ट्रीय, राज्य महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना बाळापूर शहरासह तालुक्यात एकही पारंपरिक वीटभट्टी नसल्याचा अहवाल तहसीलदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे, त्यामुळे कायद्यानुसार वीटभट्टय़ावर कारवाईची जबाबदारी असलेल्या प्रदूषण मंडळाला आता काय करावे,  हा प्रश्न निर्माण झाला आहे. पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. 

ठळक मुद्देबाळापूर तहसीलदारांची प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राष्ट्रीय, राज्य महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना बाळापूर शहरासह तालुक्यात एकही पारंपरिक वीटभट्टी नसल्याचा अहवाल तहसीलदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे, त्यामुळे कायद्यानुसार वीटभट्टय़ावर कारवाईची जबाबदारी असलेल्या प्रदूषण मंडळाला आता काय करावे,  हा प्रश्न निर्माण झाला आहे.पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. त्याप्रमाणे राष्ट्रीय-राज्य महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर वीटभट्टीची जागा निश्‍चित झाली आहे, तर पारंपरिक वीटभट्टय़ा मानवी वस्तीपासून कमीत कमी दोनशे मीटरच्या पुढे असाव्या, असे बंधन आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले; मात्र त्यानंतरही हवेची गुणवत्ता बिघडविणार्‍या वीटभट्टय़ांसंदर्भात कोणतीही कारवाई अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली नाही. त्यासाठी महसूल विभागाकडून सातत्याने केवळ माहिती मागविण्यात आली. ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर फेब्रुवारी २0१७ मध्ये जिल्हय़ात कागदोपत्री केवळ ४६ वीटभट्टय़ा असल्याचे दर्शवण्यात आले. त्यापैकी सहा ठिकाणी वीज केंद्रातील राखेपासून विटांची निर्मिती केली जाते. 

वीटभट्टय़ांसाठी बंधनकारक नियममानवी वसाहतीलगतच्या पर्यावरणातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी विटांचा आकार व एकावेळी निर्मितीच्या संख्येनुसार वीटभट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती असल्याशिवाय वीटभट्टी सुरू करता येत नाही, असा नियम आहे. त्यामध्ये ९ : ४ : ६ इंच आकाराच्या २५ हजार आणि  ९ : ४ : ३ इंच आकाराच्या ५0 हजारांपेक्षा जास्त नगांची निर्मिती करणार्‍यांना राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानके आणि कायद्यातील अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येने विटांची निर्मिती करणार्‍यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीची गरज नसली, तरी कायद्यातील अटी व शर्ती पाळणे बंधनकारक आहेत.

महामार्गालगत वीटभट्टय़ांची गर्दी कायद्यानुसार वीटभट्टय़ांना आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घ्यावी लागणार आहे; मात्र सद्यस्थितीत अकोला जिल्हय़ातील अनेक गावे, महामार्गालगतच वीटभट्टय़ांची प्रचंड गर्दी आहे. त्यामध्ये बाळापूर, चोहोट्टा, हाता, अंदुरा, भौरद, मनात्री या ठिकाणी महामार्गालगतच वीटभट्टय़ा आहेत. त्यापैकी काहीच भट्टय़ांची माहिती महसूल विभागाकडे आहे. उर्वरित भट्टय़ा अनधिकृत असल्याचेच चित्र आहे. आता तर बाळापूर तहसीलदारांनी वीटभट्टय़ांची माहितीच निरंक दिली. त्यानुसार कारवाई कुणावर करावी, हा प्रश्न प्रदूषण नियंत्रण मंडळाला पडला आहे. 

आधीच्या माहितीत तफावत सुरुवातीला बाळापूर तहसीलदारांनी तालुक्यात १0 वीटभट्टय़ा असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली होती. आता निरंक देण्यात आली. त्याचवेळी मूर्तिजापूर-२३, अकोट-९, अकोला-२, बाश्रीटाकळी-१ अशीही माहिती देण्यात आली होती.