शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मानवी वस्तीलगत वीटभट्टय़ा नसल्याचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:21 IST

अकोला: राष्ट्रीय, राज्य महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना बाळापूर शहरासह तालुक्यात एकही पारंपरिक वीटभट्टी नसल्याचा अहवाल तहसीलदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे, त्यामुळे कायद्यानुसार वीटभट्टय़ावर कारवाईची जबाबदारी असलेल्या प्रदूषण मंडळाला आता काय करावे,  हा प्रश्न निर्माण झाला आहे. पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. 

ठळक मुद्देबाळापूर तहसीलदारांची प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राष्ट्रीय, राज्य महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना बाळापूर शहरासह तालुक्यात एकही पारंपरिक वीटभट्टी नसल्याचा अहवाल तहसीलदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे, त्यामुळे कायद्यानुसार वीटभट्टय़ावर कारवाईची जबाबदारी असलेल्या प्रदूषण मंडळाला आता काय करावे,  हा प्रश्न निर्माण झाला आहे.पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. त्याप्रमाणे राष्ट्रीय-राज्य महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर वीटभट्टीची जागा निश्‍चित झाली आहे, तर पारंपरिक वीटभट्टय़ा मानवी वस्तीपासून कमीत कमी दोनशे मीटरच्या पुढे असाव्या, असे बंधन आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले; मात्र त्यानंतरही हवेची गुणवत्ता बिघडविणार्‍या वीटभट्टय़ांसंदर्भात कोणतीही कारवाई अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली नाही. त्यासाठी महसूल विभागाकडून सातत्याने केवळ माहिती मागविण्यात आली. ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर फेब्रुवारी २0१७ मध्ये जिल्हय़ात कागदोपत्री केवळ ४६ वीटभट्टय़ा असल्याचे दर्शवण्यात आले. त्यापैकी सहा ठिकाणी वीज केंद्रातील राखेपासून विटांची निर्मिती केली जाते. 

वीटभट्टय़ांसाठी बंधनकारक नियममानवी वसाहतीलगतच्या पर्यावरणातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी विटांचा आकार व एकावेळी निर्मितीच्या संख्येनुसार वीटभट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती असल्याशिवाय वीटभट्टी सुरू करता येत नाही, असा नियम आहे. त्यामध्ये ९ : ४ : ६ इंच आकाराच्या २५ हजार आणि  ९ : ४ : ३ इंच आकाराच्या ५0 हजारांपेक्षा जास्त नगांची निर्मिती करणार्‍यांना राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानके आणि कायद्यातील अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येने विटांची निर्मिती करणार्‍यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीची गरज नसली, तरी कायद्यातील अटी व शर्ती पाळणे बंधनकारक आहेत.

महामार्गालगत वीटभट्टय़ांची गर्दी कायद्यानुसार वीटभट्टय़ांना आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घ्यावी लागणार आहे; मात्र सद्यस्थितीत अकोला जिल्हय़ातील अनेक गावे, महामार्गालगतच वीटभट्टय़ांची प्रचंड गर्दी आहे. त्यामध्ये बाळापूर, चोहोट्टा, हाता, अंदुरा, भौरद, मनात्री या ठिकाणी महामार्गालगतच वीटभट्टय़ा आहेत. त्यापैकी काहीच भट्टय़ांची माहिती महसूल विभागाकडे आहे. उर्वरित भट्टय़ा अनधिकृत असल्याचेच चित्र आहे. आता तर बाळापूर तहसीलदारांनी वीटभट्टय़ांची माहितीच निरंक दिली. त्यानुसार कारवाई कुणावर करावी, हा प्रश्न प्रदूषण नियंत्रण मंडळाला पडला आहे. 

आधीच्या माहितीत तफावत सुरुवातीला बाळापूर तहसीलदारांनी तालुक्यात १0 वीटभट्टय़ा असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली होती. आता निरंक देण्यात आली. त्याचवेळी मूर्तिजापूर-२३, अकोट-९, अकोला-२, बाश्रीटाकळी-१ अशीही माहिती देण्यात आली होती.