शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

तपासणी समितीच्या अहवालात अकोला शहर हगणदरीमुक्त

By admin | Updated: July 2, 2017 09:31 IST

‘स्वच्छ भारत’ अभियानाचे दोन्ही टप्पे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहरातील नागरिकांना वैयक्तीक शौचालय बांधून दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी अकोलेकरांमध्ये जनजागृती अभियान राबवले. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले असून, राज्य शासनाच्या तपासणी समितीने केलेल्या सर्वेक्षणात शहर हगणदरीमुक्त असल्याचे दिसून आले. तसा अहवाल समितीच्यावतीने शनिवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांना सादर केला. ह्यस्वच्छ भारतह्ण अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांकडे वैयक्तीक शौचालये नाहीत, त्यांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मनपा प्रशासनाला निधी प्राप्त झाला. मागील दीड वर्षांपासून प्रशासनाने शहरी भागात पात्र लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना शौचालये बांधून दिली. अभियानच्या दुसऱ्या टप्प्यात शहराला हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार मनपाने अकोलेकरांमध्ये जनजागृती करीत उघड्यावर शौचास बसल्यास रोगराई पसरत असल्याची जाणीव करून दिली. आठ महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या चमूने शहराचे सर्वेक्षण केले असता सुधारणेला वाव असल्याचे संकेत दिले होते. त्यादिशेने प्रशासनाने प्रयत्न केल्यानंतर शहर हगणदरीमुक्त झाल्याचा ठराव महापालिकेच्या सभागृहात पारित करण्यात आला. हा ठराव शासनाकडे सादर केल्यानंतर मनपाच्या दाव्याची पुन्हा पडताळणी करण्यासाठी राज्य शासनाची चमू शहरात दाखल झाली. यामध्ये समितीचे प्रमुख प्रादेशिक उपसंचालक (नगर परिषद शाखा,नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय) सुधीर शंभरकर, चंद्रपूर मनपाचे उपायुक्त विजय देवळीकर, स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनाय विभागाचे सुहास चव्हाण, अस्तित्व महिला बहुउद्देशिय संस्थेच्या (बुलडाणा)पे्रमलता सोनोने यांचा सहभाग होता. समितीने शहराच्या विविध भागात पाहणी करून शहर हगणदरीमुक्त झाल्याचा अहवाल मनपा आयुक्त अजय लहाने यांच्याकडे सादर केला. गोपनीय पद्धतीने केली तपासणीशहरातील काही ठराविक भागात नागरिक उघड्यावर शौचास बसतात. याची नोंद मनपा प्रशासनाने घेतल्यानंतर ही माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात आली होती. मनपाच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी शासनाच्या समितीने तीन दिवसांत गोपनीय पद्धतीने तपासणी केल्याची बाब शनिवारी समोर आली. आयुक्तांकडे सोपवला अहवाल!शासनाच्या समितीने तयार केलेला अहवाल आयुक्त अजय लहाने यांच्याकडे सादर केला. यावेळी दालनात समितीच्या सदस्यांसह मनपा उपायुक्त समाधान सोळंके, क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे, अनिल बिडवे, राजेंद्र घनबहाद्दूर, दिलीप जाधव,विभाग प्रमुख शाम गाढे,भरत शर्मा आदी उपस्थित होते.