शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

पीक नुकसानीचा अहवाल अखेर शासनाकडे

By admin | Updated: November 8, 2014 00:14 IST

अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यात ९ हजार ९६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान.

अकोला : गेल्या जुलै महिन्यात अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात ९ हजार ९६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या पीक नुकसानीचा अहवाल तब्बल तीन महिन्यांनंतर अखेर शुक्रवारी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला.यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने उशिरा हजेरी लावली होती. त्यानंतर झालेला पाऊसही अल्प प्रमाणात झाला; मात्र गेल्या २२ व २३ जुलै रोजी दोन दिवस जिल्ह्यात अतवृष्टी झाली. अतवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांना तडाखा बसला. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने, पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानीचे सर्वेक्षण तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांमार्फत करण्यात आले. सर्वेक्षणाचे काम सप्टेंबरमध्ये पूर्ण करण्यात आले, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर, पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल १ नोव्हेंबर रोजी तयार करण्यात आला. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तयार करण्यात आलेल्या पीक नुकसानीच्या या अंतिम अहवालानुसार जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांमध्ये २३७ गावांमध्ये ९ हजार ९६९ हेक्टर ४0 आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये ८ हजार २६२ हेक्टर ४३ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले असून, १ हजार ७0६ हेक्टर ९७ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्याच्या आत नुकसान झाले. अतवृष्टीनंतर तब्बल तीन महिन्याने, जिल्ह्यातल्या चार तालुक्यातील पीक नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अखेर शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी विभागीय शासनाकडे पाठविण्यात आला. *७६३ हेक्टर जमीन खरवडून गेली!अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात ७६३ हेक्टर ५९ आर शेतजमीन खरवडून गेली. त्यामध्ये आकोट तालुक्यात १९२.0८ हेक्टर, तेल्हारा तालुक्यात ३१५.९४ हेक्टर, बाळापूर तालुक्यात २८.0१ हेक्टर व मूर्तिजापूर तालुक्यात २२५.१५ हेक्टर शेतीचे क्षेत्र खरवडून गेल्याचेही पीक नुकसानीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

*नुकसानभरपाईची शेतकर्‍यांना प्रतीक्षा!यावर्षीच्या पावसाळ्यात अल्प पावसामुळे मूग, उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. त्यातच अतवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाकडून पीक नुकसानाची मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.