शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

पाणीटंचाईमुळे बदलले विवाहाचे स्थळ

By admin | Updated: May 9, 2017 19:53 IST

परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, याची झळ विवाह सोहळ्याच्या आयोजनाला बसत आहे.

आगर परिसरातील चित्रआगर: परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, याची झळ विवाह सोहळ्याच्या आयोजनाला बसत आहे. येथून जवळच असलेल्या हातला लोणाग्रा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष पाहता येथील पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचे स्थळच बदलले असल्याचे चित्र आहे. खारपाणपट्टय़ातील आगर व परिसरातील हातला, लोणाग्रा येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती पाहता ग्रामस्थांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचे स्थळच बदलणे सुरू केले आहे. पाणीटंचाईमुळे जेथे पाणी असेल त्या गावात विवाह करण्यास पालक उत्सुक असल्याचे चित्र आहे. परिसरातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी स्वाक्षरीचे निवेदन पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयात दाखल केले. या प्रकाराबाबत लक्ष देण्याची मागणी केली आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी कळविले आहे. याचा परिणाम लग्नसमारंभावर होत असल्याचे दिसून येत आहे. हातला येथील चक्रधर कसुरकार यांच्या वैशाली नामक मुलीच्या विवाह सोहळा बाखराबाद येथील योगेश माळी यांच्याशी आयोजित करण्यात आला होता; पण पाणीटंचाईमुळे सदर विवाह सोहळा ७ मे रोजी उगवा फाट्यावरील काशी विश्‍वनाथ महाराज मंदिर येथे पार पडला. पाणीटंचाईमुळे लग्नस्थळ बदलण्याची वेळ खारपाणपट्टय़ातील गावांवर आली आहे. (वार्ताहर)