शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठण अडकले बँकांमध्ये

By admin | Updated: May 9, 2015 01:59 IST

अकोला जिल्ह्यातील कर्जदार शेतक-यांना पीककर्ज केव्हा मिळणार?

संतोष येलकर/ अकोला : दुष्काळी परिस्थितीत कर्जदार शेतकर्‍यांच्या पीककर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण आणि त्यांना पुन्हा पीककर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात असला तरी ८ मेपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १0 हजारांवर कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले नाही. कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रियाच बँकांमध्ये अडकल्याने, कर्जदार शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थि तीत शेतकरी हवालदिल झाला. दुष्काळाच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकल्याच्या पृष्ठभूमीवर २0१४-१५ मध्ये पीककर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या पीककर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करून शेतकर्‍यांना यावर्षी नवीन कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय ७ एप्रिल रोजी राज्य शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करून, त्यांना यावर्षी पुन्हा कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांमार्फत १३ व २६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील २७ राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले. सन २0१४-१५ मध्ये जिल्ह्यात १ लाख १७ हजार ५५९ शेतकर्‍यांनी पीककर्ज घेतले आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या ७0 हजार शेतकर्‍यांसह राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या ४८ हजार कर्जदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करण्याची प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने, ७0 शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण होणे अद्याप बाकी आहे.