शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठण अडकले बँकांमध्ये

By admin | Updated: May 9, 2015 01:59 IST

अकोला जिल्ह्यातील कर्जदार शेतक-यांना पीककर्ज केव्हा मिळणार?

संतोष येलकर/ अकोला : दुष्काळी परिस्थितीत कर्जदार शेतकर्‍यांच्या पीककर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण आणि त्यांना पुन्हा पीककर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात असला तरी ८ मेपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १0 हजारांवर कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले नाही. कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रियाच बँकांमध्ये अडकल्याने, कर्जदार शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थि तीत शेतकरी हवालदिल झाला. दुष्काळाच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकल्याच्या पृष्ठभूमीवर २0१४-१५ मध्ये पीककर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या पीककर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करून शेतकर्‍यांना यावर्षी नवीन कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय ७ एप्रिल रोजी राज्य शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करून, त्यांना यावर्षी पुन्हा कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांमार्फत १३ व २६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील २७ राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले. सन २0१४-१५ मध्ये जिल्ह्यात १ लाख १७ हजार ५५९ शेतकर्‍यांनी पीककर्ज घेतले आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या ७0 हजार शेतकर्‍यांसह राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या ४८ हजार कर्जदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करण्याची प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने, ७0 शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण होणे अद्याप बाकी आहे.