शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
4
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
5
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
6
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
7
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
8
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
9
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
10
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
11
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
12
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
13
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
14
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
15
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
16
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
17
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
18
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
19
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
20
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल इंडियातून ग्रामपंचायती दूरच;  ग्रामस्थांना इंटरनेट अ‍ॅक्सेसची सुविधा कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 14:51 IST

अकोला : ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेटचा वापर सुकर व्हावा, यासाठी डिजिटल इंडियात ग्रामपंचायतीही डिजिटल करण्याचे प्रयत्न अद्याप तरी कागदावरच सुरू आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायती जिल्हा आणि राज्य स्तराशी आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याची सुविधा सुरूच झाली नाही. डिजिटल इंडियाचा सर्वाधिक पर्दाफाश नोटबंदीच्या काळातच झाला. डिजिटल ग्रामपंचायती कधी अस्तित्वात येणार, याची प्रतीक्षा ग्रामस्थांना आहे.

अकोला : ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेटचा वापर सुकर व्हावा, यासाठी डिजिटल इंडियात ग्रामपंचायतीही डिजिटल करण्याचे प्रयत्न अद्याप तरी कागदावरच सुरू आहेत. त्यामुळे याबाबत सद्यस्थिती काय आहे, याची माहितीही शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध नाही. दिशा समितीच्या बैठकीत ही माहिती ठेवणे आवश्यक असताना तेथेही ती दिली जात नसल्याची माहिती आहे.डिजिटल इंडियाच्या नावे केंद्र शासनाने आतापर्यंत प्रचंड बोंब मारली आहे. त्यासाठी नोटबंदीच्या काळात आॅनलाइन व्यवहार करण्याचा पर्यायही नागरिकांसमोर ठेवण्यात आला. डिजिटल इंडियाचा सर्वाधिक पर्दाफाश नोटबंदीच्या काळातच झाला. ग्रामीण भागात गतीने वापरली जाईल, अशी इंटरनेटची सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे पॉस मशीनद्वारे व्यवहार कसे करावे, ही समस्या विचारतानाच ती विरून गेली. त्याशिवाय, ग्रामपंचायतींमध्येच सर्व शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचाही उपक्रम शासनाने सुरू केला; मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटीअभावी ती कागदपत्रे मिळणेही कठीण झाले आहे. ग्रामपंचायत स्तरावरील अनेक कामे आताही तालुका किंवा मोठ्या वस्तीच्या ठिकाणी जाऊनच करावी लागतात. ही समस्या ग्रामीण भागात सर्वत्र असताना केंद्र शासनाने डिजिटल इंडियाचा नारा ठोकला. त्याचवेळी ग्रामपंचायतींमध्ये ती सोय करता येते की नाही, याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच डिजिटल इंडियाची घोषणा सध्यातरी हवेतच आहे. सर्व ग्रामपंचायती जिल्हा आणि राज्य स्तराशी आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याची सुविधा सुरूच झाली नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या घोषणेनंतर किती ग्रामपंचायती डिजिटल झाल्या, याची कोणतीही माहिती प्रशासकीय यंत्रणेकडे उपलब्ध नाही. परिणामी, डिजिटल इंडियात डिजिटल ग्रामपंचायती कधी अस्तित्वात येणार, याची प्रतीक्षा ग्रामस्थांना आहे.- ग्रामपंचायतमध्ये उभारणार केंद्र!डिजिटल इंडियात ग्रामपंचायती डिजिटल करण्यासाठी जागा आवश्यक आहे. त्या ठिकाणी आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जोडल्यानुसार इंटरनेटची सुविधा उपलब्ध होईल. त्या ठिकाणी ग्रामस्थांना इंटरनेट अ‍ॅक्सेसची सुविधा दिली जाईल, असे शासनाने आधीच्या घोषणेत सांगितले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत