शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अकोट शहरातील ३५० वर्ष जुन्या कबरींचे शांततेत स्थानांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:44 IST

अकोट : अकोट शहरातील शिवाजी चौकातील ३५० वर्ष प्राचीन असलेल्या दोन दर्ग्यांमधील कबरींचे सोमवारी शांततेत स्थानांतर करण्यात आले.

ठळक मुद्दे नगरपालिका प्रशासनाने नोटीस  काढल्यानंतर नागरिकांकडून स्वयंस्फुर्तीने धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे. अकोट शहरातील मुश्ताक अली मोहम्मद अली यांच्यापूर्वजांची कबर असलेला पीर करोडी दर्गा, व मोहम्मद अली सय्यद जाफर यांच्या पूर्वजांची कबर असलेला गैबी शाह बाबा दर्ग्याच्या समावेश आहे. सोमवारी पहाटे ४. ३० वाजे पासून सदर प्रक्रियेस सुरवात करून सकाळी ७ वाजे पर्यंत दोन्हीही कबरी खोदून त्या मधील माती धार्मिक पद्धतीने विधिवत दुसऱ्या योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली.

अकोट : शहरातील शासकीय व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून उभारलेली धार्मिक स्थळे ८ मार्च पर्यंत हटवा अन्यथा ९ मार्चपासून धडक कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस  नगरपालिका प्रशासनाने काढल्यानंतर नागरिकांकडून स्वयंस्फुर्तीने धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून अकोट शहरातील शिवाजी चौकातील ३५० वर्ष प्राचीन असलेल्या दोन दर्ग्यांमधील कबरींचे सोमवारी शांततेत स्थानांतर करण्यात आले.शहरातील दहा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्या बाबत महाराष्ट्र शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर अकोट शहराची संवेदनशीलता पाहता अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी प्रत्येक धार्मिक स्थळांच्या पदाधिकाºयांची वेगवेगळी बैठक घेऊन सदर धार्मिक स्थळ निष्कासनाची अपरिहार्यता त्यांचे लक्ष्यात आणून देऊन प्रशासनास सहकार्य करण्या चे आवाहन केले होत. त्या आव्हानाला व्यापक प्रतिसाद मिळून हिंदू, मुस्लिम व बौद्ध बांधवानी हळू हळू स्वत:हून धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरू केले आहे. अतिक्रमण हटविण्याच्या दुसऱ्या  टप्प्यात एकूण १० धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. ज्या मध्ये सर्वात महत्वाचे अंदाजे ३५० वर्षांपूर्वी सध्याच्या शिवाजी चौकात असलेले २ दर्गे अतिशय महत्वाचे आहेत. त्या पैकी अकोट शहरातील मुश्ताक अली मोहम्मद अली यांच्यापूर्वजांची कबर असलेला पीर करोडी दर्गा, व मोहम्मद अली सय्यद जाफर यांच्या पूर्वजांची कबर असलेला गैबी शाह बाबा दर्ग्याच्या समावेश आहे. मुस्लिम समाजाचे धार्मिक भावनेचा विचार करता, सदर दर्ग्यांच्या निष्कासन करण्या पूर्वी दोन्ही दग्यार्तील कबरीचे विधिवत स्थलांतर होणे अंत्यत आवश्यक होते. याचा विचार करून पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी दोन्ही दर्ग्या चे सध्याचे वारस असलेले अनुक्रमे मुश्ताक अली मोहम्मद अली व मोहम्मद अली सय्यद अली यांच्यासोबत चर्चा केली. दोन्ही मुस्लिम बांधवांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याची तयारी दाखविली व सदर कबरी मधील माती विधिवत धार्मिक पद्धतीने योग्य ठिकाणी स्वत:हून स्थलांतरित करून सदर धार्मिक स्थळ हटविण्यात मोलाची भूमिका बजावली. त्या अनुषंगाने सोमवारी पहाटे ४. ३० वाजे पासून सदर प्रक्रियेस सुरवात करून सकाळी ७ वाजे पर्यंत दोन्हीही कबरी खोदून त्या मधील माती धार्मिक पद्धतीने विधिवत दुसºया योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. संवेदनशील अकोट शहरात हिंदू, मुस्लिम व बौद्ध बांधव घेत असलेल्या समंजस भूमिके मूळे, अकोट शहरावर लागलेला संवेदनशीलतेचा डाग पुसण्यास निश्चितपणे मदत होणार असल्याने पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी हिंदु, मुस्लिम, बौद्ध बांधवांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहे, आजची कारवाई पोलिस अधीक्षक कला सागर , अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलिस अधिकारी छगन राव इंगळे ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई, गणेश पाटील व कर्मचाºयांनी केली, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

 

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट