शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

अकोला महापालिकेच्या तक्रारीला रिलायन्सचा ठेंगा; १२ लाखांचा दंड जमा केलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:22 IST

अकोला : महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करणाऱ्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने मनपा प्रशासनाला ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने रिलायन्स कंपनीला जलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी आठ लाख रुपये व पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी चार लाख, असा एकूण १२ लाख रुपयांचा दंड आकारला होता. कंपनी दंडात्मक रकमेचा भरणा करत नसल्याचे ...

ठळक मुद्देजलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी आठ लाख रुपये व पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी चार लाख, असा एकूण १२ लाख रुपयांचा दंड आकारला होता. कंपनी दंडात्मक रकमेचा भरणा करत नसल्याचे पाहून जलप्रदाय विभागाने खदान पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. मनपा प्रशासन व पोलीस तक्रारीचा कवडीचाही धाक नसल्यामुळे की काय, कंपनीने मागील अकरा महिन्यांपासून प्रशासनाला चांगलेच झुलवत ठेवले आहे.

अकोला : महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय करणाऱ्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीने मनपा प्रशासनाला ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने रिलायन्स कंपनीला जलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी आठ लाख रुपये व पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी चार लाख, असा एकूण १२ लाख रुपयांचा दंड आकारला होता. कंपनी दंडात्मक रकमेचा भरणा करत नसल्याचे पाहून जलप्रदाय विभागाने खदान पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. मनपा प्रशासन व पोलीस तक्रारीचा कवडीचाही धाक नसल्यामुळे की काय, कंपनीने मागील अकरा महिन्यांपासून प्रशासनाला चांगलेच झुलवत ठेवले आहे. या प्रकरणाची महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे.मनपा क्षेत्रात व नवीन प्रभागांमध्ये रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्यावतीने केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. खडकी परिसरातील श्रद्धानगर येथे कंपनीच्या खोदकामात मनपाची ९०० व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटण्याचा प्रकार सप्टेंबर २०१७ मध्ये घडला होता. त्यावेळी ऐन जलसंकटाच्या काळात लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला होता. मनपाच्या जलप्रदाय विभागाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर रिलायन्स कंपनीच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत कंत्राटदार स्वामी टेलीनेट अ‍ॅन्ड कन्स्ट्रक्शन कंपनी, धुळे यांना १२ लाखांचा दंड आकारला होता. यामध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आठ लाख रुपये आणि शुद्ध पाण्याचा अपव्यय झाल्यामुळे ४ लाख रुपये दंडात्मक रकमेचा समावेश होता. महिनाभराचा कालावधी उलटून गेल्यावरही कंपनी दंडात्मक रकमेचा भरणा करत नसल्याचे पाहून भाजप नगरसेवक विजय इंगळे यांनी प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला होता.कंपनीचे आव्हान; सत्तापक्षाचे दुर्लक्षऐन पाणीटंचाईच्या काळात जलवाहिनी फोडणाºया व शहरात मनपाच्याच परवानगीने फोर-जी केबलचे जाळे टाकणाºया रिलायन्स कंपनीने प्रशासनाला आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. उत्पन्न वाढीच्या सबबीखाली अकोलेकरांना सुधारित कर लागू करणाºया सत्ताधारी भाजपाचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगरसेवकाच्या पत्रानंतर तक्रार का?रिलायन्स कंपनी दंडात्मक रकमेचा भरणा करीत नसल्याचे पाहून भाजप नगरसेवक इंगळे यांनी जलप्रदाय विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी कंपनीविरोधात खदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवून आता दहा महिन्यांचा कालावधी होत आहे. अद्यापपर्यंतही रिलायन्स कंपनीने दंडाच्या रकमेचा भरणा न करता महापालिकेला झुलवत ठेवल्याचे समोर आले आहे. नगरसेवकाच्या पत्रानंतरच तक्रार का, आणि इतक ा कालावधी उलटून गेल्यावरही जलप्रदाय विभागाने का चुप्पी साधली, असे नानाविध प्रश्न अकोलेकर उपस्थित करीत आहेत.

कंपनीने अद्यापही दंडाची रक्कम जमा केली नाही. ही रक्कम जमा केल्याशिवाय भविष्यात कंपनीला शहरात कोणत्याही कामाची परवानगी दिली जाणार नाही. कंपनीवर कारवाईचे अनेक पर्याय खुले असून, त्याचा विचार केला जात आहे.-जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका