शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

उमा प्रकल्पासाठी पुनर्वसन प्रस्तावाचे घोंगडे भिजतच

By admin | Updated: May 7, 2015 01:29 IST

हजारावर घरांचे पुनर्वसन रखडले

संतोष येलकर /अकोला: जिल्ह्यातील उमा बॅरेज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बाधित होणार्‍या चार गावांमधील १ हजार ७२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत दोन वर्षांपूर्वी शासनाकडे सादर करण्यात आला आहे; मात्र मान्यतेअभावी हा प्रस्ताव अद्याप शासन दरबारी अद्याप प्रलंबित आहे. पुनर्वसन प्रस्तावाचे घोंगडे भिजतच पडल्याने, हजारावर घरांच्या पुनर्वसनाचे काम रखडले आहे.उमा बॅरेज प्रकल्पाच्या कामासाठी बुडीत क्षेत्रातील बाधित होणार्‍या एकूण चार गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे. त्यामध्ये लंघापूर येथील ३५४ घरांचे व रोहणा येथील १0४ घरांचे सिरसो शिवारात, पोही येथील ५0४ घरांचे माना शिवारात पुनर्वसन करावयाचे असून, माना येथील ७४ घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा ठरविणे अद्याप बाकी आहे. एकूण १ हजार ७२ घरांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागामार्फत ३0 नोव्हेंबर २0१२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेला हा पुनर्वसनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १३ डिसेंबर २0१२ रोजी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाला अद्याप शासनाकडून मान्यता मिळाली नाही. पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने, १ हजार ७२ घरांच्या पुनर्वसनाचे काम रखडले आहे. शासनाच्या मान्यतेअभावी पुनर्वसन प्रस्तावाचे घोंगडे भिजतच असल्याने, हजारावर घरांमधील कुटुंबांच्या पुनर्वसनासह उमा प्रकल्पाचे कामही पूर्ण होऊ शकले नाही.