शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातून पुनर्वसित ग्रामस्थ मध्यरात्री गावाकडे परतण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:01 IST

अकोट / पोपटखेड : अकोट तालुक्यातील पुनर्वसित ग्रामस्थांनी सुविधेचा अभाव व मृत्यूच्या तांडवाच्या भीतीने मेळघाटात ९ सप्टेंबर रोजी परतले. प्रशासनाचा आदेश झुगारून रात्रभर पायी चालल्यानंतर या ग्रामस्थांनी व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावी मुक्काम ठोकला. या ग्रामस्थांची समजूत काढण्याकरिता  १0 सप्टेंबर रोजी सकाळी वन व महसूल प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले. 

ठळक मुद्देप्रभाव लोकमतचामुख्यमंत्र्यांनी घेतली दखलआठवड्यात मुंबईला बैठक

विजय शिंदे/ गौतम कदम । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट / पोपटखेड : अकोट तालुक्यातील पुनर्वसित ग्रामस्थांनी सुविधेचा अभाव व मृत्यूच्या तांडवाच्या भीतीने मेळघाटात ९ सप्टेंबर रोजी परतले. प्रशासनाचा आदेश झुगारून रात्रभर पायी चालल्यानंतर या ग्रामस्थांनी व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावी मुक्काम ठोकला. या ग्रामस्थांची समजूत काढण्याकरिता  १0 सप्टेंबर रोजी सकाळी वन व महसूल प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले. दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर सर्व मागण्या शासन पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन देऊन ग्रामस्थांचे मन वळविण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. प्रशासनाला आश्‍वासन पाळण्याचा अल्टिमेटम देत सायंकाळपर्यंत दोन बसेस ग्रामस्थांना घेऊन खटकाली गेटवर परतल्या होत्या. दरम्यान, पुनर्वसित गावकर्‍यांच्या या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, येत्या आठवड्यात मुंबई येथे बैठक बोलाविण्यात आली असल्याने मध्यरात्री ग्रामस्थ गावाकडे परतण्यास सुरुवात झाली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गाभाक्षेत्रातील अमोना, बारुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बु., नागरतास व केलपानी  या गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतु, वन विभागाने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही, तसेच महसूल प्रशासनाने सुविधा  पुरविल्या नाहीत. त्यामुळे हे ग्रामस्थ मुला-बाळांसह पोपटखेड व खटकालीचे गेट तोडून मेळघाटात गेले होते. यावेळी अन्यायाने त्रस्त झालेल्या पुनर्वसित गावकर्‍यांनी गुन्हे दाखल करण्याचा आदेश व तैनात असलेल्या पोलीस व वन विभागाच्या ताफ्याला न जुमानता मेळघाटात धडक दिली. त्यामुळे हादरलेले प्रशासन १0 सप्टेंबर रोजी सकाळीच  खटकाली गेटवरून मेळघाटात दाखल झालेल्या ग्रामस्थांजवळ पोहोचले. याठिकाणी ग्रामस्थांनी वन विभागातील काही अधिकार्‍यांनी केलेला अन्याय पुनर्वसनाच्या रकमेवरून झालेली हेळसांड, रोजगार व शेती नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न व आरोग्यासह वातावरण मानवत नसताना पुनर्वसित गावात असलेल्या असुविधेचा पाढा वाचला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अमरावती जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक विशाल माळी, सुनील शर्मा, अकोट उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, अचलपूर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, अकोट तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, सहायक उपवनसंरक्षक संजय पार्डीकर,  गटविकास अधिकारी कालीदास तापी यांनी पुनर्वसित ग्रामस्थांच्या व्यथा ऐकून घेतल्या. 

पुनर्वसित गावकर्‍यांवर झालेला अन्याय व असुविधेनंतर मेळघाटात परतलेल्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरतेने दखल घेतली आहे. पुनर्वसित गावकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता आणि चर्चा करण्याकरिता येत्या आठवड्यात मुंबई येथे बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव डॉ. प्रवीण परदेशी यांनी १0 सप्टेंबर रोजी दुपारी सांगितले. - राजकुमार पटेल, माजी आमदार, मेळघाट