शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गावाचे शंभर टक्के पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करा; जांभावासीयांनी काढला धडक मोर्चा

By संतोष येलकर | Updated: June 1, 2023 16:23 IST

मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ.शरद जावळे यांना सादर करण्यात आले.

अकोला: काटेपूर्णा बॅरेज बुडीत क्षेत्रातील जांभा बु. गावाचे शंभर टक्के पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्यात यावे, अशी मागणी करीत, जांभा बु. येथील ग्रामस्थांनी गुरुवार, १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मोर्चा काढून मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हयातील मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा बु. गाव काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असल्याने, गेल्या २००९ मध्ये संपूर्ण जांभा बु.गावाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रकल्पास सहकार्य केले. त्यानंतर २००९ प्रकल्पाचे सुरु करण्यात आले असून, २०१२ मध्ये सुध्दा गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाच्या संबंधित अभियंत्याकडून देण्यात आले होते.

संपूर्ण गावाचे पुनर्वसन होणार असल्याने, गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत गावातील विकासकामे थांबविण्यात आली होती.परंतू २०२१ मध्ये जांभा बु. संपूर्ण गावापैकी १३ टक्के गावाचे पुनर्वसन करण्याचा एकतर्फी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गावाच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जांभा बु. गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्याचे आश्वासन संबंधित आमदार आणि तत्कालीन पालकमंत्र्यांकडून देण्यात आले होते. परंतू यासंदर्भात देण्यात आलेल्या आश्वासनांवर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जांभा बु.गावाचे शंभर टक़्के पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्यात यावे, या मागणीसाठी जांभा बु.येथील ग्रामस्थांनी १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मोर्चा काढला.

मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ.शरद जावळे यांना सादर करण्यात आले. या मोर्चात जांभा बु. पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती बाळासाहेब ठोकळ, जांभा बु.येथील सरपंच कृष्णा पाटील गावंडे, गौतम साऊतकर, गोपाल ठाेकळ, प्रदीप काटोलकार, सुरेश शेंडोकार, मुरलीधर चिकटे, रेखा सपकाळ, शारदा ठोकळ, कांता सोनोने, कुसुम ठोकळ, वेणू उबाळे, विठ्ठल ठोकळ, दिपक लाठेकर, सुभाष तायडे, गजानन तायडे यांच्यासह जांभा बु. येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते.

चारही बाजूची जमीन संपादीत; पुनर्वसन १३ टक्के !काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जांभा बु. गावाच्या चारही बाजूची जमीन संपादीत करण्यात आली असून, १ लाख ४० हजार रुपये प्रती एकर दराने जमीन संपादीत करण्यात आली. परंतू गावाचे पुनर्वसन मात्र केवळ १३ टक्के करण्यात आले.