शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

गावाचे शंभर टक्के पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करा; जांभावासीयांनी काढला धडक मोर्चा

By संतोष येलकर | Updated: June 1, 2023 16:23 IST

मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ.शरद जावळे यांना सादर करण्यात आले.

अकोला: काटेपूर्णा बॅरेज बुडीत क्षेत्रातील जांभा बु. गावाचे शंभर टक्के पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्यात यावे, अशी मागणी करीत, जांभा बु. येथील ग्रामस्थांनी गुरुवार, १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मोर्चा काढून मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हयातील मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा बु. गाव काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असल्याने, गेल्या २००९ मध्ये संपूर्ण जांभा बु.गावाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रकल्पास सहकार्य केले. त्यानंतर २००९ प्रकल्पाचे सुरु करण्यात आले असून, २०१२ मध्ये सुध्दा गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाच्या संबंधित अभियंत्याकडून देण्यात आले होते.

संपूर्ण गावाचे पुनर्वसन होणार असल्याने, गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत गावातील विकासकामे थांबविण्यात आली होती.परंतू २०२१ मध्ये जांभा बु. संपूर्ण गावापैकी १३ टक्के गावाचे पुनर्वसन करण्याचा एकतर्फी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गावाच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जांभा बु. गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्याचे आश्वासन संबंधित आमदार आणि तत्कालीन पालकमंत्र्यांकडून देण्यात आले होते. परंतू यासंदर्भात देण्यात आलेल्या आश्वासनांवर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जांभा बु.गावाचे शंभर टक़्के पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्यात यावे, या मागणीसाठी जांभा बु.येथील ग्रामस्थांनी १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मोर्चा काढला.

मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ.शरद जावळे यांना सादर करण्यात आले. या मोर्चात जांभा बु. पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती बाळासाहेब ठोकळ, जांभा बु.येथील सरपंच कृष्णा पाटील गावंडे, गौतम साऊतकर, गोपाल ठाेकळ, प्रदीप काटोलकार, सुरेश शेंडोकार, मुरलीधर चिकटे, रेखा सपकाळ, शारदा ठोकळ, कांता सोनोने, कुसुम ठोकळ, वेणू उबाळे, विठ्ठल ठोकळ, दिपक लाठेकर, सुभाष तायडे, गजानन तायडे यांच्यासह जांभा बु. येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते.

चारही बाजूची जमीन संपादीत; पुनर्वसन १३ टक्के !काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जांभा बु. गावाच्या चारही बाजूची जमीन संपादीत करण्यात आली असून, १ लाख ४० हजार रुपये प्रती एकर दराने जमीन संपादीत करण्यात आली. परंतू गावाचे पुनर्वसन मात्र केवळ १३ टक्के करण्यात आले.