शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

प्रादेशिक विकास मंडळे बरखास्त होण्याच्या मार्गावर; ३० एप्रिल रोजी संपणार मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:17 IST

मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मंडळांना मुदतवाढ देण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याने ही मंडळे बरखास्त होण्याच्या मार्गावर आहेत.

- राजेश शेगोकार

अकोला : राज्यात प्रादेशिक समतोल विकास साधण्यासाठी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या क्षेत्रांसाठी प्रादेशिक विकास मंडळे निर्माण करण्यात आले होते. या मंडळांची मुदतवाढ ३० एप्रिल रोजी संपत असून सोमवार, २७ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मंडळांना मुदतवाढ देण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याने ही मंडळे बरखास्त होण्याच्या मार्गावर आहेत.विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या तिन्ही विभागाच्या विकासाचा अनुशेष दूर व्हावा, यासाठी तीन मंडळे निर्माण करण्यात आली होती. राज्यघटनेच्या कलम ३७१ (२) अन्वये राष्ट्रपतींनी ९ मार्च १९९४ रोजी तीन प्रादेशिक विकास मंडळे स्थापन करण्याबाबत आदेश निर्गमित केले. या आदेशान्वये राज्यपालांनी ३० एप्रिल १९९४ रोजी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या क्षेत्रांसाठी तीन वैधानिक मंडळांची स्थापना केली. २५ जून १९९४ रोजी मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका केल्या. या मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिल १९९९ ला संपणार होता; परंतु विकासाचा प्रादेशिक असमतोल पूर्णपणे दूर न झाल्याने राष्ट्रपतींनी मंडळाला ३० एप्रिल २०१० पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर ३० एप्रिल २०१० पासून दर पाच वर्षांनी या मंडळांना मुदतवाढ मिळाली. येत्या ३० एप्रिल रोजी या मंडळाची मुदतवाढ संपुष्टात येत आहे. या पृष्ठभूमिवर नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी,महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मुदतवाढीची शिफारस माननीय राज्यपाल यांना करावी, अशी मागणी केली; परंतु २७ एप्रिल २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी काही निर्णय न झाल्याचे समजते. त्यामुळे महाराष्ट्रात विकास मंडळे यांना मुदतवाढ मिळणार की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली आहे.

मंडळेच रद्द करण्याचा तर डाव नाही ना?सुरुवातीच्या काळात विकास मंडळांना, सामूहिक विकास योजनेंतर्गत एकत्रित रुपये शंभर कोटी इतका विशेष निधी वाटप करण्याचे अधिकार होते; परंतु ५ सप्टेंबर २०११ नंतर हे अधिकार समाप्त करण्यात आले. त्यामुळे विकास मंडळाचे अध्यक्षपद घेण्यात राजकीय व्यक्तींना रस उरला नव्हता, तसेच मंडळांच्या तज्ज्ञ सदस्यांमध्ये एनजीओद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश पण करण्यात आला, त्यामुळे या मंडळांचे अध्यक्षपद शोभेचेच ठरल्याचे समोर आले. तसेच विभागांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याचे काम खासगी संस्थांनाही देण्यात आले होते, त्यामुळे मंडळांचा मुख्य उद्देशच हरवित चालला होता. या मंडळांना मुदतवाढ न देता ही मंडळेच संपविण्याचाही डाव नाही ना? असाही संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील विभागांचा विविध क्षेत्रांमधील झालेला असमतोल विकास मांडण्याचे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून विकास मंडळाचे महत्त्व आहे; परंतु ३0 एप्रिलनंतर विकास मंडळांना मुदतवाढ न मिळाल्यास, हे व्यासपीठ, विशेष करून विदर्भ-मराठवाडा ' या अविकसित भागांना गमवावे लागेल.- डॉ. संजय खडक्कारमाजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळGovernmentसरकार