शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

अ‍ॅक्टिव्ह झोनची संख्या कमी; अकोलेकरांनी खबरदारी घेण्याची गरज - संजय कापडणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:48 IST

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात कोरोनाबाधित रुग्णांनी १४०० चा टप्पा ओलांडला असून, सर्वत्र संसर्गाचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत मनपाची यंत्रणा नेमकी कोणत्या स्वरूपाच्या उपाययोजना राबवित आहेत, याबद्दल शहरवासीयांमध्ये चर्चेच्या फैरी झडत आहेत. कोरोना वाढीसाठी प्रशासनासोबतच सर्वसामान्य अकोलेकरांनी फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे पाठ केल्याचे परिणाम समोर आले आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत साधलेला हा संवाद...

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कशी झाली?कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना तसेच संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविल्या जात आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगदरम्यान लक्षणे आढळून येणारे नागरिक आजार लपवित असल्याचे मनपा पथकांच्या निदर्शनास आले. अनेक भागात संदिग्ध रुग्णांची समजूत काढताना कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला.

संसर्गाला आळा घालण्यासाठी कोणता उपाय केला?कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या बैदपुरा भागात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबिराचे आयोजन केले. तसेच भरतीया रुग्णालयात ‘स्वॅब’ संकलन सुरू केले. याप्रमाणेच दक्षिण झोनमध्ये सिंधी कॅम्प परिसर, पश्चिम झोनमधील हरिहरपेठ, उत्तर झोनमध्ये विजय नगर, आयुर्वेदिक रुग्णालयात तातडीने संदिग्धांचे स्वॅब घेण्याला प्रारंभ केला. आजरोजी बैदपुरा कोरोनामुक्त झाला, याकडेही लक्ष द्यावे लागेल.

मृत्यू दराच्या टक्केवारीत वाढ कशी?दुर्धर आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असलेल्या वयोवृद्ध नागरिकांसाठी कोरोना दुर्दैवी ठरला. कोरोनावर प्रभावी औषधी नसल्याने प्रतिकारशक्ती वाढविण्याची औषधी दिली जाते. या औषधीला वयोवृद्ध नागरिक कितपत प्रतिसाद देतात, यावर सर्व अवलंबून असल्याने मृत्यू दरात वाढ झाल्याचे ध्यानात येते.

वाढत्या रुग्णसंख्येसाठी मनपा जबाबदार आहे का?तसे म्हणता येणार नाही. याची जाण सुज्ञ अकोलेकरांना नक्कीच आहे. लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे अकोलेकरांना वारंवार आवाहन करण्यात आले. भाजी बाजार, किराणा दुकानात साहित्य खरेदीसाठी झुंबड उडत असल्याचे चित्र आजही कायम आहे. सुरुवातीच्या काळात कंटेनमेन्ट झोनमध्ये नागरिकांचा मुक्तसंचार होता. या बाबींकडेही लक्ष द्यावे लागेल. कोरोनाचा मुकाबला करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.

कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेतल्यास प्रादुर्भाव आपोआप कमी होईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे हाच प्रभावी उपाय आहे. या नियमांचे नागरिक खरेच पालन करतात का, यावरही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. घरातील वयोवृद्ध नागरिक, लहान मुलांना संसर्ग होणार नाही, याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाinterviewमुलाखतcorona virusकोरोना वायरस बातम्या