शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

'जनता कर्फ्यू'चा कालावधी घटविला; आणखी एक दिवस सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 7:00 PM

पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यू ची कालमर्यादा तीन दिवसांनी कमी करत केवळ बुधवार ३ जून पर्यंतच जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्पष्ट केले.

अकोला. अकोल्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू प्रभावीपणे राबविण्याची गरज होती. सर्वपक्षीय नेत्यांनीही त्याकरिता पाठिंबा दिला होता मात्र पहिल्याच दिवशी अकोलेकरांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला नाही. जनतेमध्ये निरूत्साह दिसला अशी खंत व्यक्त करत पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यू ची कालमर्यादा तीन दिवसांनी कमी करत केवळ बुधवार ३ जून पर्यंतच जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्पष्ट केले.पालकमंत्री ना. कडू यांनी प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे की, अकोल्यातील कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, अधिकारी आदीसोबत पाच बैठका घेऊन नियोजन केले. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी केली त्यामुळे शहरात कोरोनाला हरविण्यासाठी जनता कर्फ्यूचा एक महत्वाचा मार्ग होता. सर्वपक्षिय बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांनी, व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला पाठींबा दिला होता त्यामुळेच १ ते ६ जून पर्यंत आपण जनतेला जनता कर्फ्यू बाबत आवाहन केले होते मात्र जनतेमध्ये निरूत्साह दिसून आला, फारसा प्रतिसाद मिळाला नाही याबाबत ना.कडू यांनी दू:ख व्यक्त केले आहे. सध्या शहरात काही प्रमाणात दूकाने उघडी आहेत यामुळे कोरोनाची साखळी तुटणार नाही केवळ प्रशासकीय प्रयत्नांमधून कोरोनाला हरविता येणार नाही, लोकांची साथ आवश्यकच आहे असे कडू यांनी स्पष्ट करून जनता कर्फ्यूची मर्यादा तीन दिवसांनी कमी करत असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :AkolaअकोलाBacchu Kaduबच्चू कडू