शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'जनता कर्फ्यू'चा कालावधी घटविला; आणखी एक दिवस सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:00 IST

पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यू ची कालमर्यादा तीन दिवसांनी कमी करत केवळ बुधवार ३ जून पर्यंतच जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्पष्ट केले.

अकोला. अकोल्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू प्रभावीपणे राबविण्याची गरज होती. सर्वपक्षीय नेत्यांनीही त्याकरिता पाठिंबा दिला होता मात्र पहिल्याच दिवशी अकोलेकरांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला नाही. जनतेमध्ये निरूत्साह दिसला अशी खंत व्यक्त करत पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यू ची कालमर्यादा तीन दिवसांनी कमी करत केवळ बुधवार ३ जून पर्यंतच जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्पष्ट केले.पालकमंत्री ना. कडू यांनी प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे की, अकोल्यातील कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, अधिकारी आदीसोबत पाच बैठका घेऊन नियोजन केले. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी केली त्यामुळे शहरात कोरोनाला हरविण्यासाठी जनता कर्फ्यूचा एक महत्वाचा मार्ग होता. सर्वपक्षिय बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांनी, व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला पाठींबा दिला होता त्यामुळेच १ ते ६ जून पर्यंत आपण जनतेला जनता कर्फ्यू बाबत आवाहन केले होते मात्र जनतेमध्ये निरूत्साह दिसून आला, फारसा प्रतिसाद मिळाला नाही याबाबत ना.कडू यांनी दू:ख व्यक्त केले आहे. सध्या शहरात काही प्रमाणात दूकाने उघडी आहेत यामुळे कोरोनाची साखळी तुटणार नाही केवळ प्रशासकीय प्रयत्नांमधून कोरोनाला हरविता येणार नाही, लोकांची साथ आवश्यकच आहे असे कडू यांनी स्पष्ट करून जनता कर्फ्यूची मर्यादा तीन दिवसांनी कमी करत असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :AkolaअकोलाBacchu Kaduबच्चू कडू