शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

महामार्गावरील खड्ड्यांसाठी कंपनीकडून होणार वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 13:37 IST

अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला ब्रेक लागल्यानंतर सध्या वापरात असलेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांची दुरुस्ती कंत्राटदार कंपनीऐवजी शासनानेच करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देवाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेले आहेत.दुरुस्त करण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची आहे.कंपनीने कामच बंद केल्याने खड्डे कोण बुजविणार, या मुद्यावर शासनाने मार्ग काढला.

अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला ब्रेक लागल्यानंतर सध्या वापरात असलेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांची दुरुस्ती कंत्राटदार कंपनीऐवजी शासनानेच करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, कामाचा खर्च कंपनीकडून वसूल करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण सुरू झाले. अमरावती ते चिखलीपर्यंत १९४ किलोमीटरचे काम चार टप्पे करण्यात आले. त्यातील अमरावती-खामगाव-चिखली या टप्प्याचे काम गेल्या जूनपासून बंद आहे. यादरम्यान, कंत्राटदार कंपनीने तुकड्यातील कामे उपकंत्राटदारांना दिले आहेत. वेगवेगळ्या उपकंत्राटदारांकडून चौपदरीकरणाचे काम सुरू होते; मात्र जूनपासून रस्त्याच्या कामाची गती मंदावली. कंत्राटदार कंपनीला बँकांकडून निधी उभारणे अशक्य झाले. कंत्राटदार कंपनीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत झालेल्या करारनाम्यानुसार मे २०१९ च्या मुदतीत काम पूर्ण बंधनकारक आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत दोन टप्प्यातील कामे ठरलेल्या काही प्रमाणात अपूर्ण आहेत. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून त्या-त्या ठरावीक मुदतीत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. कामाच्या गतीबद्दल शासनाला कळविण्यात आले आहे. त्याशिवाय, दरमहा कामाचा प्रगती अहवालही शासनाला पाठविला जातो. दरम्यान, वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. ते दुरुस्त करण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची आहे. कंपनीने कामच बंद केल्याने खड्डे कोण बुजविणार, या मुद्यावर शासनाने मार्ग काढला.- दोन टप्प्यातील कामांची निविदाराष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी शासनाने निविदा प्रसिद्ध केली. त्यामध्ये अमरावती ते व्याळा आणि तेथून चिखलीपर्यंतच्या कामाचे दोन टप्पे आहेत. त्यासाठी २.२५ कोटींपेक्षाही अधिक खर्च होणार आहे. हा खर्च शासन कंत्राटदार कंपनीकडून वसूल करणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती विभागाचे कार्यकारी अभियंता विलास ब्राम्हणकर यांनी सांगितले.- ६४ पुलांचे बांधकाम अर्धवटअमरावती-मूर्तिजापूर-बोरगाव मंजू परिसरात लहान पुलांची निर्मिती होत आहे. चिखलीपर्यंत १४ लहान पूल बांधले जाणार आहेत, त्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून लवकरच आणखी ५० पुलांची निर्मिती होणार आहे. ती सर्व कामे अर्धवट असल्याने त्यातूनही अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. त्या खोदकामाच्या सभोवती वाहनधारकांसाठी संरक्षक उपाययोजना करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6