शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रब्बी पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा विक्रमी सहभाग, ९१,७४२ शेतकऱ्यांनी केली नोंदणी

By रवी दामोदर | Updated: December 17, 2023 17:15 IST

गतवर्षीच्या केवळ १४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग

अकोला : यंदा खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत केवळ १ रुपयामध्ये सहभाग घेता आला. परिणामी, यंदा आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडून काढीत शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदविला. यंदा रब्बी हंगामात दि. १४ डिसेंबरपर्यंत तब्बल ९१ हजार ७४२ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला असून, गतवर्षी केवळ १४ हजार २४९ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता.

पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, पावसातील खंड आदी नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनाची हानी होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीकविमा योजना राबविण्यात येते. यंदा पीकविमा योजनेकरिता नोंदणीकृत शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य सरकार भरत असल्यामुळे योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एका रुपयात नोंदणी करता येत होती. परिणामी, यंदा रब्बी हंगामात ९१ हजार ७४२ शेतकऱ्यांची विक्रमी नोंदणी झाली आहे. पीकविमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांकडून १ हजार ९४९, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांकडून १ लाख ३२ हजार १६६ नोंदणी केल्या आहेत.

१.४४ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित

यंदा रब्बी हंगामात विक्रमी ९१ हजारांवर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, तब्बल १ लाख ४४ हजार ४७४ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित केले आहे. यंदा पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. भरपाई म्हणून विमा कंपन्यांकडून २५ टक्के अग्रीम रक्कम दिली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी हंगामातील पिकांसाठी पीकविमा नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पीक शेतात बहरलेले असताना, अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे नुकसानाची पुर्वसूचना केली असून, भरपाई देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी