शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई टाळण्यासाठी खराब डाळ बदलण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:41 IST

पुरवठा विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी चांगलेच अडचणीत येणार असल्याने हा घोळ निस्तरण्याचा हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: शासनाकडून एफएक्यू दर्जाचा हरभरा घेतल्यानंतर त्याची डाळ न देणाऱ्या सप्तशृंगी कंपनीकडून खराब डाळीचा पुरवठा झाला. त्या डाळीची अदला-बदल करून घेण्याच्या हालचाली पुरवठा विभागातील संबंधित अधिकारी व पुरवठादार सप्तशृंगी कंपनीकडून सुरू झाल्या आहेत. एफएक्यू डाळीऐवजी खराब डाळ देणाºया सप्तशृंगी कंपनीच्या घोळामुळे पुरवठा विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी चांगलेच अडचणीत येणार असल्याने हा घोळ निस्तरण्याचा हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.खुल्या बाजारात तूर, हरभरा डाळ महागल्याने स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींना या डाळींचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने नोव्हेंबर २०१८ मध्येच घेतला होता. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तूर, हरभºयाची भरडाई करण्याचे ठरले. त्यासाठी (एनईएमएल एनसीडीइएक्स ग्रुप कंपनी) मार्फत भरडाई करणाºया मिलर्सची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या दोन झोनसाठी नवी मुंबईतील सप्तशृंगी मिलर्सची नियुक्ती करण्यात आली. शासनाने शेतकºयांकडून हमीभावाने खरेदी केलेला एफएक्यू हरभरा, तूर या मिलर्सला भरडाईसाठी देण्यात आली. नाफेडमार्फत खरेदी केलेले धान्य एफएक्यू (फाइन एव्हरेज क्वॉलिटी) दर्जाचेच असते. त्यासाठी ग्रेडर्सची नियुक्ती केलेली असते. सप्तशृंगी कंपनीने एफएक्यू हरभरा घेतल्यानंतरी त्याची खराब डाळ शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी अनेक जिल्ह्यांत पाठवली. अकोला जिल्ह्यातही हा प्रकार घडला. त्यामुळे पुरवठादार सप्तशृंगी कंपनीने शासनासोबतच लाभार्थींच्या डोळ््यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. लाभार्थींनी ही डाळ न स्वीकारल्याने पुरवठादार कंपनीसोबतच वाटप करणाºया पुरवठा यंत्रणेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता कंपनी आणि पुरवठा यंत्रणेतील संबंधित अधिकारी-कर्मचाºयांनी ही डाळ अदला-बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातून कंपनीसोबतच पुरवठा यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे झालेला घोळ निस्तरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

डाळ परत घेण्यास कंपनीची तयारीस्वस्त धान्य दुकानात गेलेली खराब डाळ परत घेण्याची तयारी सप्तशृंगी कंपनीने दाखवल्याचे गोदामातील संबंधितांचे म्हणणे आहे. त्यासाठी साठ्यातून खराब डाळ वेगळी केली जात आहे. या प्रकाराने कंपनीने एफएक्यूऐवजी भलत्याच हरभºयाची डाळ लाभार्थींच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. आता अंगलट येत असल्याने सारवासारवही सुरू केल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, शासन नियुक्त मिलर्सने सणासुदीच्या काळात हा प्रकार केल्याने शासनाचीही मूक संमती असल्याची शक्यताही त्यामध्ये दडलेली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला