शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जीवनात यशस्वितेसाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे - डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:38 IST

जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

ठळक मुद्देदोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटनअकोल्यातील ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयात आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.अकोला येथील सिव्हिल लाइन परिसरातील श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शांताराम बुटे, ग्रंथमित्र प्रा.डॉ. एस.आर. बाहेती, प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रकाश मुकुंद, जिल्हा ग्रंथालय संस्थांचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ, अमरावतीचे सहायक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.वाचन संस्कृती पुढे नेण्यासाठी आज पुस्तकांबरोबरच ई-लायब्ररी उपलब्ध आहे. त्यामुळे माहिती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाली आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, की वाचन संस्कृती वाढवण्यात सार्वजनिक वाचनालयाचा मोठा वाटा आहे, अशी वाचनालये वाढणे अत्यंत गरजेचे आहे. या वाचनालयांना येणार्‍या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून निश्‍चितपणे प्रयत्न केला जाईल.यावेळी  बाहेती यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथपाल दीपक गेडाम यांनी केले. संचालन प्रा. गोपाल सुरे यांनी, तर आभार नवल कवडे यांनी केले. यानंतर ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फीत कापून पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिक स्टॉलला भेट दिली. ग्रंथोत्सवात विविध पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीबरोबरच परिसंवाद, विनोदी एकपात्री कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. याचा लाभ वाचकप्रेमींनी घेण्याचे आवाहन गेडाम यांनी केले आहे. ५ डिसेंबर रोजी दु. ४ वा. ग्रंथोत्सवाचा समारोप व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

ग्रंथदिंडी ठरले आकर्षणग्रंथोत्सवानिमित्त सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. या ग्रंथदिंडीत महिला वारकर्‍यांसोबतच विद्यार्थी, नागरिक मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेली दिंडी अकोलावासीयांसाठी आकर्षण ठरली.

05सीटीसीएल

टॅग्स :Dr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटीलAkola cityअकोला शहर