शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वैरणाचे दर कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:15 IST

अकोला: विदर्भात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणाचा (कडबा पेंडी)दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत.

अकोला: विदर्भात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणाचा (कडबा पेंडी)दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. पशुधनाला लागणाºया हिरव्या चाºयाची गरज भागविण्यासाठी पिंपळ, सुबाभूळ, कडुनिंबाचा चाराही विकत घेण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे; पण या वैरणाचेही दर वाढले आहेत.मागील वर्षी अल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन कमी झाले असून, त्याचसोबत चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात ज्वारी, कापूूस हे मुख्य पीक होते; परंतु अलीकडच्या काही वर्षांत या पिकाची जागा सोयाबीन पिकाने घेतल्याने विदर्भातील ही पारंपरिक पिके मागे पडली आहेत. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन घटल्याने पशुधनासाठी पोषक व आवश्यक कडबा कमी झाला. परिणामी, कडब्याचे दर प्रचंड वाढले असून, एका कडबा पेंडीचा दर ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर या कडब्यापासून तयार होेणाºया कुट्टीचा दर ८ ते १२ रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे. ही कुट्टी मात्र ओली करू न पशुपालकांना विकली जात आहे.यावर्षी तुरीच्या कुटाराचे दर तीन ते पाच रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले असून, सोयाबीनचे खाद्य (कुटार) जनावरे खात नसली तरी या कुटाराचा दर तीन रुपये किलो झाला आहे. हरभºयाचे कुटार पाच ते सात रुपये किलोपर्यंत गेले असून, सुबाभूळ, पिंंपळ, कडुनिंबाचा पाला दोन ते चार रुपये किलोने बाजारात विकला जात आहे. चाºयाचे दर प्रचंड वाढल्याने शेतकºयांना पशुधन अडचणीचे वाटत असून, वाटेल त्या दरात पशुधन विकण्यात येत आहेत. गव्हाचे कुटार (गव्हंंडा) जनावरे खात नाहीत. तथापि, या गव्हंड्याचे दरही वाढले.- ज्वारीचे क्षेत्र घटले !विदर्भातील एकट्या अकोला जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत होते. तथापि, अलीकडच्या काही वर्षांमध्ये हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले असून, २०१८-१९ मध्ये १० ते १५ हजार हेक्टरपर्यंत पेरणी झाल्याने ज्वारीपासून मिळणाºया कडब्याचे दर वाढले.- कडबा पेंडीचा दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शेतकºयांनी नवे तंत्रज्ञान वापरू न प्रथिनेयुक्त मूरघास तयार करण्याची गरज आहे. चाराटंचाईच्या या काळात गव्हंड्यावर मीठ, उसाची मळी टाकून चारा तयार करावा.डॉ.आर.बी.घोराडे,प्रमुख,ज्वारी संशोधन केंद्र,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती