शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन : राष्ट्रधर्मच सर्वश्रेष्ठ आहे - रामदास चोरोडे गुरुजी   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 18:13 IST

संत तुकाराम चौक , रिंगरोड परिसरातील बिसेननगर मैदान येथे निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर सभागृहात शनिवारी सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन पार पडले.

अकोला : राष्ट्रसंतांनी सर्वधर्म समभावतेचा विचार देत राष्ट्रधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे प्रतिपादन रामदास चोरोडे गुरुजी यांनी केले. देशातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांची आज समाजाला आवश्यकता असून, तरुणाईमध्ये हे विचार रुजविणे महत्त्वाचे आहे, असेही यावेळी त्यांनी म्हटले.संत तुकाराम चौक , रिंगरोड परिसरातील बिसेननगर मैदान येथे निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर सभागृहात शनिवारी सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्षीय भाषण देताना ते बोलत होते. संमेलनाच्या उद््घाटकीय कार्यक्रमाला विचार मंचावर उद््घाटक म्हणून प्रा. डॉ. ममता इंगोले, प्रा. ललीत काळपांडे, ज्ञानेश्वर रक्षक, प्रा. डॉ. गजानन नारे, कृष्णा अंधारे, राष्ट्रसंतांच्या भूमिकेत यावली येथील मिरजकर, कृष्णा अंधारे, ज्ञानेश्वर केसाडे महाराज, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, मनोजसिंग बिसेन, आयोजन समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना चोरोडे गुरुजी म्हणाले की, समाज अन् संत हे असे समीकरण आहे, जे एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. समाजात द्वेशभाव, अंहकाराचा प्रभाव वाढत जातो, तेव्हा समाज विस्कळीत होतो. या अधोगतीला चाललेल्या समाजाला योग्य दिशा दाखवितात तेच खरे संत ठरतात.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAkolaअकोलाcultureसांस्कृतिक