शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन ; अकोलेकरांनो, पाणी जपूनच वापरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 12:39 IST

महानच्या धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ही बाब लक्षात घेता अकोलकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.अकोलेकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो.अकोलेकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.

अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पिवळ्या रंगाच्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम वेगात सुरू असले तरी आणखी एक-दोन दिवस अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. महानच्या धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ही बाब लक्षात घेता अकोलकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील धरणात आज रोजी १८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मार्च महिन्याच्या पूर्वार्धापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम धरणातील जलसाठ्यावर होत असून, मागील वीस दिवसांच्या कालावधीत जलसाठ्यामध्ये झपाट्याने घसरण झाली आहे. बाष्पीभवनामुळे जलसाठ्यात होणारी घसरण चिंतेचा विषय आहे. यादरम्यान, जलप्रदाय विभागाने धरणातील पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत आहे. त्यावर जलशुद्धीकरण केंद्रावर उपाययोजना केली जात असली, तरी त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अकोलेकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. असे असले तरी उन्हाची तीव्रता, पाण्याचे होणारे बाष्पीभवन, पाण्याची नासाडी तसेच ऐनवेळेवर जलवाहिनी फुटण्याची शक्यता पाहता अकोलेकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.नळाचे पाणी केवळ पिण्यासाठीच!उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत वाढ होते. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांमध्ये रोष निर्माण होतो. हा विचार करून प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जात आहे. अशावेळी नागरिकांनी नळाचे पाणी केवळ पिण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. इतर अन्य कामांसाठी विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा मर्यादित वापर करण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांनीच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.नगरसेवकांची सोशल मीडियाद्वारे जनजागृतीजलशुद्धीकरण केंद्रावर होणारा तांत्रिक बिघाड, पाण्याच्या वितरण प्रणालीत ऐनवेळेवर होणारे बदल लक्षात घेता नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता मर्यादित वापर करण्याचे आवाहन करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. सोशल मीडियाद्वारे प्रभागातील नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले जात असून, या आवाहनाला नागरिक कितपत प्रतिसाद देतात, हे दिसून येणार आहे.

सार्वजनिक नळावर पाण्याचा अपव्ययघरी पाण्याची साठवणूक केल्यानंतर नागरिक वाहने व कपडे धुण्यासाठी पाण्याचा बेसुमार वापर करतात. पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी नागरिकांनी स्वत:च जागरूक होणे अपेक्षित आहे. मनपाने सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या नळावर पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. पोळा चौकात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर सार्वजनिक नळ बसविण्यात आल्यामुळे या ठिकाणी दिवसभर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येते.नळाला मोटर लावून पाण्याचा अनावश्यक उपसा करणे, रस्यावर पाणी शिंपडणे, वाहने धुण्यासाठी पाण्याची नासाडी करायची का, यावर सुज्ञ अकोलेकरांनी आत्मचिंतन करावे, पाणी पुरवठा सुरळीत क रण्याचे प्रयत्न होत आहेत.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाWaterपाणीKatepurna Damकाटेपूर्णा धरण