शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन ; अकोलेकरांनो, पाणी जपूनच वापरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 12:39 IST

महानच्या धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ही बाब लक्षात घेता अकोलकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.अकोलेकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो.अकोलेकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.

अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पिवळ्या रंगाच्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम वेगात सुरू असले तरी आणखी एक-दोन दिवस अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. महानच्या धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ही बाब लक्षात घेता अकोलकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील धरणात आज रोजी १८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मार्च महिन्याच्या पूर्वार्धापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम धरणातील जलसाठ्यावर होत असून, मागील वीस दिवसांच्या कालावधीत जलसाठ्यामध्ये झपाट्याने घसरण झाली आहे. बाष्पीभवनामुळे जलसाठ्यात होणारी घसरण चिंतेचा विषय आहे. यादरम्यान, जलप्रदाय विभागाने धरणातील पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत आहे. त्यावर जलशुद्धीकरण केंद्रावर उपाययोजना केली जात असली, तरी त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अकोलेकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. असे असले तरी उन्हाची तीव्रता, पाण्याचे होणारे बाष्पीभवन, पाण्याची नासाडी तसेच ऐनवेळेवर जलवाहिनी फुटण्याची शक्यता पाहता अकोलेकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.नळाचे पाणी केवळ पिण्यासाठीच!उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत वाढ होते. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांमध्ये रोष निर्माण होतो. हा विचार करून प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जात आहे. अशावेळी नागरिकांनी नळाचे पाणी केवळ पिण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. इतर अन्य कामांसाठी विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा मर्यादित वापर करण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांनीच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.नगरसेवकांची सोशल मीडियाद्वारे जनजागृतीजलशुद्धीकरण केंद्रावर होणारा तांत्रिक बिघाड, पाण्याच्या वितरण प्रणालीत ऐनवेळेवर होणारे बदल लक्षात घेता नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता मर्यादित वापर करण्याचे आवाहन करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. सोशल मीडियाद्वारे प्रभागातील नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले जात असून, या आवाहनाला नागरिक कितपत प्रतिसाद देतात, हे दिसून येणार आहे.

सार्वजनिक नळावर पाण्याचा अपव्ययघरी पाण्याची साठवणूक केल्यानंतर नागरिक वाहने व कपडे धुण्यासाठी पाण्याचा बेसुमार वापर करतात. पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी नागरिकांनी स्वत:च जागरूक होणे अपेक्षित आहे. मनपाने सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या नळावर पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. पोळा चौकात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर सार्वजनिक नळ बसविण्यात आल्यामुळे या ठिकाणी दिवसभर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येते.नळाला मोटर लावून पाण्याचा अनावश्यक उपसा करणे, रस्यावर पाणी शिंपडणे, वाहने धुण्यासाठी पाण्याची नासाडी करायची का, यावर सुज्ञ अकोलेकरांनी आत्मचिंतन करावे, पाणी पुरवठा सुरळीत क रण्याचे प्रयत्न होत आहेत.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाWaterपाणीKatepurna Damकाटेपूर्णा धरण