शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

अकोला जिल्ह्यात पावसाचा १0 हजार हेक्टरला तडाखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 13:35 IST

तीन तालुक्यांमध्ये पाऊस व पुरामुळे नदी व नाल्याकाठच्या शेतामधील १0 हजार १९९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात गत तीन दिवसांच्या कालावधीत संततधार बरसलेल्या पावसाचा पिकांना तडाखा बसला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोला, बाळापूर व मूर्तिजापूर या दोन तालुक्यात संततधार पाऊस व नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे १० हजार १९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे.जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत संततधार पाऊस बरसल्याने, नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये बुधवार, १९ आॅगस्ट रोजी तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर या तीन तालुक्यांमध्ये पाऊस व पुरामुळे नदी व नाल्याकाठच्या शेतामधील १0 हजार १९९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.तीन तालुक्यातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.बाळापूर तालुक्यात पावसाने ६६२७ हेक्टरचे नुकसान झाले असून, २२ गावे यामध्ये कासारखेड, गाझीपूर , मोधापूर, सातरगाव , बाभूळखेड , मांडवा खु. , काळबाई , बटवाडी खु. , बटवाडी बु. , पारस ,जोगलखेड , शेळद मांडोली , कास्तखेड , गायगाव , वाडेगाव , देगाव , व्याळा , रिधोरा , निंबा आदी गावांचा समावेश असून, अद्याप दोन सर्कलमध्ये प्राथमिक सर्व्हे सुरू असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा, लांडापूर, निंबा, मोहखेड, धोत्रा, शेंद, किनी-फनी, धानोरा वैद्य, धानोरा पाटेकर, खरब ढोरे, गाजीपूर, गोरेगाव, समशेरपूर, दताळा, उमई या गावांना फटका बसला असून, सध्या शेतात पाणी असल्याने पाहणी करता येत नाही, त्यामुळे या तालुक्यातील बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता तहसीलदारांनी व्यक्त केली आहे.

‘या’ पिकांचे झालेले नुकसान!संततधार पाऊस व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात ३ हजार ५७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार दोन्ही तालुक्यात नदी-नाले काठच्या शेतामधील सोयाबीन, तूर ,उडीद , मूग इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे.

संततधार पाऊस व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांकडून प्राप्त झाला आहे. एक नुकसानाचा प्राथमिक अहवाल गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.-संजय खडसे, निवासी उप-जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोला