शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

By admin | Updated: February 16, 2016 01:09 IST

यावर्षी मान्सूनला परिस्थिती अनुकूल.

अकोला : विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून, किमान तापमान सरासरी २0 अंश सेल्सिअसपर्यंंत पोहोचले आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. १६ फेब्रुवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने फेब्रुवारी महिन्यातच कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. विदर्भातील तापमान वाढत आहे; परंतु गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, पावसाची शक्यता वाढली आहे. दरम्यान, गत चोवीस तासांत सोमवार सकाळी ८.३0 वाजेपर्यंत विदर्भातील किमान तापमान चंद्रपूर येथे २३.२ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आले आहे. ब्रह्मपुरी येथे २१.३, नागपूर २0.२, वर्धा २२.५ किमान तापमान होते. तर, अकोला २0.८, अमरावती २0.४, बुलडाणा २0.0, वाशिम १९.0, गोंदिया २0.६ तर यवतमाळचे किमान तापमान २२.८ अंश सेल्सिअस होते. राज्यात नाशिकचे किमान तापमान सर्वात कमी म्हणजे १३.३ अंश सेल्सिअस होते. उर्वरित राज्यात मुंबई (कुलाबा) २0.0, सांताक्रुझ १६.४, रत्नागिरी १७.५, डाहणू १८.८, भिरा १४.५, पुणे १५.९, अहमदनगर १४.0,जळगाव १४.४, कोल्हापूर १८.५, सांगली १७.९, सातारा १७.१, सोलापूर २१.७, उस्मानाबाद १९.४, औरंगाबाद २0.४, परभणी २0.६, नांदेड येथे १८.0 तापमान होते. यावर्षी मान्सून बर्‍यापैकी असल्याचे भाकीत आतापासूनच विविध हवामानशास्त्र संस्था काढत असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.