शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

पावसाची दडी; शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST

अकोला : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत; परंतु अद्यापही सर्वदूर पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मागील ...

अकोला : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत; परंतु अद्यापही सर्वदूर पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मागील तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ग्रामीण भागातील बस बंद

अकोला : एसटी महामंडळाकडून लांब पल्ल्याच्या बस सोडण्यात येत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील बस बंद असल्याने खेड्यापाड्यातील प्रवाशांना अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून बसस्थानकावर प्रवासी संख्याही वाढली आहे.

दिवसभर उकाडा

अकोला : गेल्या आठवड्याचा विचार करता सायंकाळपर्यंत आकाशात ढग गर्दी करतात. सायंकाळी काही सरी येतात व गारवा सुटतो. तुरळक ठिकाणी एखादी हलकी सर येऊन जाते आणि ढग पांगून जातात, असेच काहीसे चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान, दिवसभर प्रचंड उकाडा जाणवतो.

आठवडी बाजार बंदचा फटका

अकोला : खरीप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी शेतातील भाजीपाला पीक व जवळ असलेला उरलासुरला शेतमाल विक्रीची घाई करीत आहे; परंतु आठवडी बाजार बंद असल्याने शेतमालाला दर मिळत नाही.

स्कूल बसचालक अडचणीत

अकोला : कोरोनाचा सर्वाधिक फटका हा स्कूल बसचालक, मालकांना बसला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून स्कूल बसची चाके एका जागेवरच असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही चालकांना भाजीपाला विकावा लागत आहे, तर काही चालकांना शेती, मोलमजुरीची कामे करण्याची वेळ आली आहे.

रेशन दुकानांमध्ये गर्दी वाढली!

अकोला : अंत्योदय, प्राधान्य, तसेच पंतप्रधान गरीब कुटुंब कल्याण योजनेंतर्गत सामान्य नागरिकांना रेशनचे धान्य देणे सुरू केल्याने ग्रामीण, तसेच शहरी भागातील रेशन दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे.

कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे!

अकोला : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत आहे. यातील काहींना शासनाने विमा लागू केला आहे. त्याच धर्तीवर सरपंच, सदस्यांनाही विमा कवच लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात काही ग्रामपंचायतींनी निवेदनही दिले आहे.

कोरोनामुळे कर्ज माफ करण्याची मागणी

अकोला : दारिद्र्यरेषेखालील नागरिक आणि विविध योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेतून व्यवसायासाठी घेतलेले कर्ज भरणे आता कठीण होत आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे.

किराणा दुकानांमधील गर्दी ओसरली!

अकोला : कडक निर्बंध असताना किराणा विक्रीला मुभा देण्यात आली होती. यावेळी बहुतांश नागरिक किराणा खरेदीसाठी गर्दी करीत होते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर किराणा दुकानातील गर्दी ओसरली आहे.