शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी; शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST

अकोला : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत; परंतु अद्यापही सर्वदूर पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मागील ...

अकोला : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत; परंतु अद्यापही सर्वदूर पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मागील तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ग्रामीण भागातील बस बंद

अकोला : एसटी महामंडळाकडून लांब पल्ल्याच्या बस सोडण्यात येत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील बस बंद असल्याने खेड्यापाड्यातील प्रवाशांना अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून बसस्थानकावर प्रवासी संख्याही वाढली आहे.

दिवसभर उकाडा

अकोला : गेल्या आठवड्याचा विचार करता सायंकाळपर्यंत आकाशात ढग गर्दी करतात. सायंकाळी काही सरी येतात व गारवा सुटतो. तुरळक ठिकाणी एखादी हलकी सर येऊन जाते आणि ढग पांगून जातात, असेच काहीसे चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान, दिवसभर प्रचंड उकाडा जाणवतो.

आठवडी बाजार बंदचा फटका

अकोला : खरीप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी शेतातील भाजीपाला पीक व जवळ असलेला उरलासुरला शेतमाल विक्रीची घाई करीत आहे; परंतु आठवडी बाजार बंद असल्याने शेतमालाला दर मिळत नाही.

स्कूल बसचालक अडचणीत

अकोला : कोरोनाचा सर्वाधिक फटका हा स्कूल बसचालक, मालकांना बसला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून स्कूल बसची चाके एका जागेवरच असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही चालकांना भाजीपाला विकावा लागत आहे, तर काही चालकांना शेती, मोलमजुरीची कामे करण्याची वेळ आली आहे.

रेशन दुकानांमध्ये गर्दी वाढली!

अकोला : अंत्योदय, प्राधान्य, तसेच पंतप्रधान गरीब कुटुंब कल्याण योजनेंतर्गत सामान्य नागरिकांना रेशनचे धान्य देणे सुरू केल्याने ग्रामीण, तसेच शहरी भागातील रेशन दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे.

कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे!

अकोला : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत आहे. यातील काहींना शासनाने विमा लागू केला आहे. त्याच धर्तीवर सरपंच, सदस्यांनाही विमा कवच लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात काही ग्रामपंचायतींनी निवेदनही दिले आहे.

कोरोनामुळे कर्ज माफ करण्याची मागणी

अकोला : दारिद्र्यरेषेखालील नागरिक आणि विविध योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेतून व्यवसायासाठी घेतलेले कर्ज भरणे आता कठीण होत आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे.

किराणा दुकानांमधील गर्दी ओसरली!

अकोला : कडक निर्बंध असताना किराणा विक्रीला मुभा देण्यात आली होती. यावेळी बहुतांश नागरिक किराणा खरेदीसाठी गर्दी करीत होते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर किराणा दुकानातील गर्दी ओसरली आहे.