शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

‘अवकाळी’चा तडाखा: मागणी २९७ कोटींची; मिळाले ७२ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:29 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत २९७ कोटी ९४ लाख ३० हजार रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असली तरी; मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात खरीप पिकांसह बागायती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांसाठी गत १६ नोव्हेंबर रोजी मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शेतकºयांना देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी २९७ कोटी ९४ लाख ३० हजार रुपये मदत निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांना मदत व सवलती देण्याचा निर्णय १८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात आला असून, मदतनिधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी शासनामार्फत १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध मदत निधी जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.मदतीची २५ टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यात होणार जमा!जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ टक्के म्हणजेच ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला आहे. उपलब्ध मदत निधी १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील बाधित शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची २५ टक्के रक्कम जमा करण्यात येणार आहे.शेतकºयांच्या याद्या तयार करा; जिल्हाधिकाºयांचे निर्देश!मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात बाधित शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची २५ टक्के रक्कम जमा करण्यासाठी बँकनिहाय शेतकºयांच्या याद्या तयार करून, यादीनुसार मदतीच्या रकमेचे देयक कोषागार कार्यालयात जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार व उपविभागीय अधिकाºयांना १९ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे दिले.अवकाळी पावसाने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. मदत निधी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला असून, बाधित शेतकºयांना २५ टक्केप्रमाणे मदतीची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला