शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

‘अवकाळी’चा अकोला जिल्ह्यात १७२८ हेक्टरवरील पिकांना फटका

By राजेश शेगोकार | Updated: March 19, 2023 20:18 IST

तेल्हारा तालुक्यात १२०० हेक्टर क्षेत्र बाधित: सर्व्हे करण्याची मागणी

राजेश शेगाेकार, अकोला: गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पातूर, बार्शीटाकळी व तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव झाला असून, त्यामुळे तब्बल १ हजार ७२८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असल्याने पंचनामे रखडले आहेत. नुकसानग्रस्त भागात अधिकाऱ्यांनी पाहणी केली असली तरी, कागदोपत्री काहीच अहवाल घेतला नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता.

त्यानुसार, जिल्ह्यात अवकाळी पावसाने पातूर, बार्शीटाकळी तालुक्यासह ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. तसेच दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाच्या गारांनी पातूर तालुक्याला झोडपले. पातूर तालुक्यातील पांगरताटी, आलेगाव, उंमरवाडी, पिंपरडोली, राहेर, उमरा आदी गावांमध्ये गारा पडल्या. तर इतर भागात जोरदार पाऊस झाला. रविवारीही रिमझिम पाऊस सुरूच होता. अवकाळी पावसामुळे तेल्हारा, पातूर व बार्शीटाकळी तालुक्यातील १७२८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. त्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी थांबत नसल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.११८४ शेतकऱ्यांचे नुकसानप्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे १ हजार १८४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून पाहणी केली जात आहे; मात्र कागदोपत्री काहीच अहवाल घेतला जात नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

असे झाले नुकसान

तालुका - बाधित क्षेत्र

तेल्हारा - १२०० हेक्टरपातूर - ३७४ हेक्टरबार्शीटाकळी - १५४ हेक्टर

भंडारज बु. परिसरात लिंबू, भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान

सतत दोन दिवसांच्या पावसामुळे व वाऱ्यामुळे पातूर तालुक्यातील भंडारज बु. व भंडारज खु . या गावातील रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा, हायब्रीड ज्वारी, फळबाग, लिंबू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरात सर्व्हे करून मदत देण्याची मागणी रवींद्र खेकडे, नयन अमानकर, दीपक शेंडे, संजय उजाडे, गणेश म. शेंडे, नंदू ठाकरे, गजानन राऊत, अक्षय भागे, दीपक इंगळे, बाबुलाल सुरवाडे, सुधाकर गव्हाळे आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Akolaअकोला