शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST

शेतकऱ्यांमध्ये आनंद: अकोला: मृग नक्षत्रात प्रारंभी समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने प्रारंभी शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर आठवडाभरापासून दडी मारल्याने उगवलेली ...

शेतकऱ्यांमध्ये आनंद:

अकोला: मृग नक्षत्रात प्रारंभी समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने प्रारंभी शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर आठवडाभरापासून दडी मारल्याने उगवलेली पिके संकटात सापडली होती. दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मूर्तिजापूर, पातूर, बोरगाव मंजू, कानशिवणी, वाहाळा बु., वाडेगाव, दिग्रससह बाळापूर तालुक्यात वादळ वाऱ्यासह पाऊस बरसला.

-----------------------

मूर्तिजापूर तालुक्यातील निंभा येथे रोहित्रावर कोसळली वीज

मूर्तिजापूर: तालुक्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. निंभा येथे वीज रोहित्रावर वीज कोसळल्याने काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

तालुक्यात गत दहा दिवसांनंतर पावसाने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हजेरी लावली असून, निंभा येथे वीज रोहित्रावर वीज कोसळल्याने गावातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पथदिवे फुटून खाली पडले, तर नागरिकांना विजेचा सौम्य धक्का बसल्याची माहिती आहे. तालुक्यातील चिखली, गोरेगाव, गाजीपूर, सालतवडा, समशेरपूर, आमतवाडा, शेलू बाजार, दुधलम, हातगाव जामठी, निंभा येथे पावसाने हजेरी लावली. तालुक्यात अनेक ठिकाणी पेरणी झाली असली, तरी काही भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. तुरळक ठिकाणी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला आहे तर ७५ टक्के पेरणी व्हायची असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

-----------------------

कानशिवणी परिसरात पेरणीला येणार वेग

बोरगाव मंजू: मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. परिसरात केवळ ५ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली होती. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, रविवारी कानशिवणीसह बोरगाव मंजू परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उगवलेल्या पिकांना संजीवनी मिळाली, तर रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू होणार असल्याचे शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

--------------

गतवर्षी खरीप हंगामातील नगदी पीक असलेले मूग, उडीद हातचे गेले होते. यंदा चांगला पाऊस असल्याने चांगले उत्पादन होण्याची आशा होती. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

-हरिभाऊ चिलवंते, शेतकरी, कानशिवणी.