शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IND vs SA : सूर्यानं भरवसा दाखवला नाही! मॅचनंतर पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही! कारण...
4
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
6
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
7
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
8
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
9
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
10
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
11
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
12
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
13
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
14
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
15
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
16
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
17
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
18
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
19
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
20
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात छापेमारी; ४४ गाेवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या; १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत उभारले हाेते चेकनाके

By आशीष गावंडे | Updated: June 17, 2024 22:49 IST

पुरेसा पाऊस हाेताच शेतकरी वर्गात पेरणीची लगबग सुरु हाेते. ही बाब हेरुन गाेवंश तस्कर डाेके वर काढतात.

अकाेला: शेतकऱ्यांचे गाेधन चाेरीला जात असल्याच्या घटनांची गंभीर दखल घेत जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार बकरी इदच्या पृष्ठभूमिवर जिल्हाभरात छापेमारी करुन तब्बल ४४ गाेवंश तस्करांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, २० गाेवंशांना जीवनदान मिळाले असून या कारवाइसाठी १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत तात्पुरते २७ चेक नाके उभारण्यात आले हाेते,हे विशेष. 

पुरेसा पाऊस हाेताच शेतकरी वर्गात पेरणीची लगबग सुरु हाेते. ही बाब हेरुन गाेवंश तस्कर डाेके वर काढतात. शेतकऱ्यांचे गाेधन चाेरुन त्यांची निर्दयतेने कत्तल हाेत असल्याचे पाहता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी जिल्हाभरातील पाेलिस यंत्रणेला गाेवंश तस्करांना हुडकून काढत त्यांना बेड्या ठाेकण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुषंगाने १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत तात्पुरत्या स्वरुपाचे चेक नाके उभारण्यात आले.

मागील १७ दिवसांच्या कालावधीत अवैधरित्या गोवंशाची निर्दयतेने वाहतुक करुन त्यांची कत्तल करणाऱ्या तस्करांना पकडण्याची माेहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाभरात ४० केसेस दाखल केल्या असून ४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाइ दरम्यान, २० गोवंशांना जीवनदान देण्यात आले. पाेलिसांनी चार वाहनासह १४ लक्ष ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पाच महिन्यांत १०४ तस्करांना बेड्याबच्चन सिंह यांनी १ जानेवारी राेजी जिल्हा पाेलिस अधीक्षक पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच क्राइम मिटींगमध्ये गाेवंश तस्करीला समुळ उखडून टाकण्याचे निर्देश दिले हाेते. मागील पाच महिन्यांच्या कालावधीत याप्रकरणी शहरासह जिल्ह्यातील पाेलिस ठाण्यांत ८५ गुन्हे दाखल करण्यात येऊन १०४ तस्करांना अटक करण्यात आली आहे. तसेच तस्करांकडून तब्बल ९६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाइला गती देण्याची सूचनागाेधन चाेरीला जात असल्याने शेतकरी वर्ग मानसिकरित्या खचून जाताे. वाहनात गाेवंशांना काेंबून त्यांची कत्तल करणाऱ्या तस्करांना पकडण्याच्या कारवाइला गती देण्याची सूचना जिल्हा पाेलिस अधीक्षक सिंह यांनी पाेलिस यंत्रणेला दिली आहे.