शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

‘ओबीसीं’च्या प्रश्नांवर राहुल गांधींची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 04:04 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशभरातील विविध समुदायांसोबत सध्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यामध्येच इतर

राजेश शेगोकार/लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशभरातील विविध समुदायांसोबत सध्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यामध्येच इतर मागासवर्गीय घटकांच्या समस्या व त्यांच्यासमोर असणाऱ्या प्रश्नांची माहिती घेण्यासाठी प्रत्येक राज्यातील निवडक नेत्यांसोबत राहुल गांधी हे स्वत: चर्चा करीत असून, २२ जुलै रोजी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. या संवादासाठी निवडलेल्या राज्यातील २४ प्रतिनिधी पश्चिम वऱ्हाडातील दोन आमदारांसह पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. केंद्रातील काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर राज्यातील काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. त्यामुळे हतबल झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा नवी उमेद देण्यासाठी विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत आहे. विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडतानाच समाजातील विविध घटकांसोबत संवाद असावा, त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेत त्यादृष्टीने पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस पक्ष कामाला लागला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे स्वत: पुढाकार घेत असून, त्यामधूनच समाजाच्या विविध घटकांमधील पदाधिकाऱ्यांसोबत संवादाची प्रक्रिया सुरू झाली आहे. २२ जुलै रोजी दिल्ली येथे ‘ओबीसीं’ संदर्भात झालेल्या बैठकीत खासदार राजीव सातव, विजय वडेट्टीवार, बुलडाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, आमदार अमित झनक, अकोल्याचे प्रकाश तायडे यांच्यासह अलका राठोड, रमेश राख आदी २४ प्रतिनिधींचा समावेश होता. काँग्रेस पक्षाने ‘मला कर्जमाफी मिळालीच नाही’, असे आंदोलन सुरू केले असून, त्याद्वारे कर्जमाफीमधील फसवेगिरी समोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचेही नेत्यांनी सांगितले. ओबीसींच्या न्यायासाठी काँग्रेसने रस्त्यावर उतरले पाहिजे, असे निर्देश राहुल यांनी दिले.