शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

‘ओबीसीं’च्या प्रश्नांवर राहुल गांधींची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 04:04 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशभरातील विविध समुदायांसोबत सध्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यामध्येच इतर

राजेश शेगोकार/लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशभरातील विविध समुदायांसोबत सध्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यामध्येच इतर मागासवर्गीय घटकांच्या समस्या व त्यांच्यासमोर असणाऱ्या प्रश्नांची माहिती घेण्यासाठी प्रत्येक राज्यातील निवडक नेत्यांसोबत राहुल गांधी हे स्वत: चर्चा करीत असून, २२ जुलै रोजी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. या संवादासाठी निवडलेल्या राज्यातील २४ प्रतिनिधी पश्चिम वऱ्हाडातील दोन आमदारांसह पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. केंद्रातील काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर राज्यातील काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. त्यामुळे हतबल झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा नवी उमेद देण्यासाठी विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत आहे. विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडतानाच समाजातील विविध घटकांसोबत संवाद असावा, त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेत त्यादृष्टीने पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस पक्ष कामाला लागला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे स्वत: पुढाकार घेत असून, त्यामधूनच समाजाच्या विविध घटकांमधील पदाधिकाऱ्यांसोबत संवादाची प्रक्रिया सुरू झाली आहे. २२ जुलै रोजी दिल्ली येथे ‘ओबीसीं’ संदर्भात झालेल्या बैठकीत खासदार राजीव सातव, विजय वडेट्टीवार, बुलडाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, आमदार अमित झनक, अकोल्याचे प्रकाश तायडे यांच्यासह अलका राठोड, रमेश राख आदी २४ प्रतिनिधींचा समावेश होता. काँग्रेस पक्षाने ‘मला कर्जमाफी मिळालीच नाही’, असे आंदोलन सुरू केले असून, त्याद्वारे कर्जमाफीमधील फसवेगिरी समोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचेही नेत्यांनी सांगितले. ओबीसींच्या न्यायासाठी काँग्रेसने रस्त्यावर उतरले पाहिजे, असे निर्देश राहुल यांनी दिले.