शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राफेलने मोदी अडकले कात्रीत - अ‍ॅड. आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 19:13 IST

अकोला : राफेल विमान खरेदीची किंमत सर्वोच्च न्यायालयापुढे उघड करावीच लागणार आहे. तसे न केल्यास न्यायालय केंद्राला नोटीस देईल. तरीही माहिती न दिल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होणारा देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणून मोदीची नोंद होईल. किंमत उघड झाल्यास त्याचे स्पष्टीकरण देताना संघाच्या नाकीनऊ येणार आहे, अशा कात्रीत मोदी अडकणार आहेत, असे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले.

अकोला : राफेल विमान खरेदीची किंमत सर्वोच्च न्यायालयापुढे उघड करावीच लागणार आहे. तसे न केल्यास न्यायालय केंद्राला नोटीस देईल. तरीही माहिती न दिल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होणारा देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणून मोदीची नोंद होईल. किंमत उघड झाल्यास त्याचे स्पष्टीकरण देताना संघाच्या नाकीनऊ येणार आहे, अशा कात्रीत मोदी अडकणार आहेत, असे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले.शासकीय विश्रामगृहात त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे प्रदेश सल्लागार आमदार बळीराम सिरस्कार, महासचिव युसूफ पुंजाणी, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे उपस्थित होत्या.हाउसिंग फायनान्स सेक्टरला नॉन बँकिंग फायनान्स सेक्टरने दिलेली ४० हजार कोटींची परतफेड १ नोव्हेंबर रोजी करायची होती, तर ३० नोव्हेंबरपर्यंत एक लाख कोटींची परतफेड करायची आहे; मात्र हाउसिंग फायनान्सकडून ही रक्कम वसूल होणे कठीण झाले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी शेअर मार्केट गडगडणार आहे. तसे झाल्यास देशात आर्थिक अराजकता माजल्याचा पुरावा जगासमोर येणार असल्याचा दावाही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. त्यामुळे देश वाचवायचा आहे की बुडवायचा, हे ठरविण्याची वेळ हिंदुत्ववाद्यांवर आली आहे. राम मंदिर, खात्यात १५ लाख देणे, नोटाबंदी या सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याने मोदी, फडणवीस यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यातूनच शहरी नक्षलवादाचे भूत उभे केले जात आहे. सनातन्यांकडे बंदुका, बॉम्ब, हत्यारे आढळल्यानंतरही त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.- युती होणे काळाची गरज!भयंकर अवस्थेतून देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षाची युती होणे काळाची गरज आहे. स्थैर्य असलेल्या पक्षांची सत्ता येणे महत्त्वाचे आहे; मात्र युतीच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये होत आहेत. प्रत्यक्षात त्यासाठी काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंत चर्चा पोहोचलीच नसल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील