शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

राफेलने मोदी अडकले कात्रीत - अ‍ॅड. आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 19:13 IST

अकोला : राफेल विमान खरेदीची किंमत सर्वोच्च न्यायालयापुढे उघड करावीच लागणार आहे. तसे न केल्यास न्यायालय केंद्राला नोटीस देईल. तरीही माहिती न दिल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होणारा देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणून मोदीची नोंद होईल. किंमत उघड झाल्यास त्याचे स्पष्टीकरण देताना संघाच्या नाकीनऊ येणार आहे, अशा कात्रीत मोदी अडकणार आहेत, असे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले.

अकोला : राफेल विमान खरेदीची किंमत सर्वोच्च न्यायालयापुढे उघड करावीच लागणार आहे. तसे न केल्यास न्यायालय केंद्राला नोटीस देईल. तरीही माहिती न दिल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होणारा देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणून मोदीची नोंद होईल. किंमत उघड झाल्यास त्याचे स्पष्टीकरण देताना संघाच्या नाकीनऊ येणार आहे, अशा कात्रीत मोदी अडकणार आहेत, असे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले.शासकीय विश्रामगृहात त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे प्रदेश सल्लागार आमदार बळीराम सिरस्कार, महासचिव युसूफ पुंजाणी, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे उपस्थित होत्या.हाउसिंग फायनान्स सेक्टरला नॉन बँकिंग फायनान्स सेक्टरने दिलेली ४० हजार कोटींची परतफेड १ नोव्हेंबर रोजी करायची होती, तर ३० नोव्हेंबरपर्यंत एक लाख कोटींची परतफेड करायची आहे; मात्र हाउसिंग फायनान्सकडून ही रक्कम वसूल होणे कठीण झाले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी शेअर मार्केट गडगडणार आहे. तसे झाल्यास देशात आर्थिक अराजकता माजल्याचा पुरावा जगासमोर येणार असल्याचा दावाही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. त्यामुळे देश वाचवायचा आहे की बुडवायचा, हे ठरविण्याची वेळ हिंदुत्ववाद्यांवर आली आहे. राम मंदिर, खात्यात १५ लाख देणे, नोटाबंदी या सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याने मोदी, फडणवीस यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यातूनच शहरी नक्षलवादाचे भूत उभे केले जात आहे. सनातन्यांकडे बंदुका, बॉम्ब, हत्यारे आढळल्यानंतरही त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.- युती होणे काळाची गरज!भयंकर अवस्थेतून देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षाची युती होणे काळाची गरज आहे. स्थैर्य असलेल्या पक्षांची सत्ता येणे महत्त्वाचे आहे; मात्र युतीच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये होत आहेत. प्रत्यक्षात त्यासाठी काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंत चर्चा पोहोचलीच नसल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील